शैक्षणिक

कृषीकन्यानि केले कीटकाबाबत मार्गदर्शन

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या सत्रातील कृषीकन्यानि उमरखेड तालुक्यातील बारा येथे शेतकर्यांना भेट देऊन मित्र किटकाबाबत केले मार्गदर्शन. कृषीकन्या सानिका शृंगारे, जया धरणकर, समृद्धी शेळके, पूजा जाधव,भाग्यश्री काले,सुषमा भिसे यांनी शेतकऱ्यांना मित्र किटकांची ओळख करून दिली. सततच्या हवामान बदलामुळे पिकांवरील हानिकारक कीटकांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे कृषीकन्यानि यावर उपाय म्हणून मित्र किटकांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. वाढत्या रासायनिक औषधाच्या वापरामुळे अंत मित्र किटकांची संख्या कमी झाली आहे. तर यांची संख्या आपण कशी वाढवू शकतो तसेच यांचे संवर्धन करण्याची काय गरज आहे या बद्दल कृषिकन्यानि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सोडवण्याचा प्रयन्त केला. त्या मधलीच एक महत्वाची समस्या म्हणजे शेतामलाला योग्य तो भाव मिळत नाही. सोबतच पांढऱ्या माशीमुळे होणारा रोग येल्लोव मोसैक वायरस यावर खबरदारीचा उपाय म्हणून काय करायला पाहिजे यावर सुद्धा कृषिकन्यानि मार्गदर्शन केले. या प्रसंगी गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!