अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची आलेले पीक खलडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.परंतु शासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यामुळे भारतीय किसान मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी आज महागाव तहसील ला मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले त्यावेळेस तात्या शिंदे प्रमोद जाधव देविदास पाटील अमृतराव देशमुख संजय डोंगरे असंख्य शेतकऱ्यांनी तहसील मध्ये येऊन तहसीलदाराला निवेदन देऊन महागाव तालुक्यातील मागील वर्षी झालेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तात्काळ जमा करावे महागाव येथील कृषी विभागाचा व महसूल विभागाचा संयुक्त पंचनामे करून याद्या शासनाकडे सादर केल्या शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकले नाही त्याला लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम मिळवून द्यावी अशी मागणीला जोर धरत आहे.तात्काळ पैसे जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारत किसन मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.