Uncategorized

वेणी लोअर पूस धरण प्रकल्पाची दुरावस्था करणाऱ्या प्रकल्प अभियंता अविनाश भगत यांच्यावर कारवाई केव्हा ?

( धरणातील गाळ काडीकचरा , जलपर्णी काढण्याच्या नावावर दीड कोटी रुपयांचे वर शासनाकडून निधी मंजूर करून खर्ची घालून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणाऱ्या अभियंत्यास कोणाचे पाठबळ शेतकरी संभ्रमात !


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


धरणाच्या गेट समोरील जलपर्णी काडीकचरा लाकडाची खोडे काढण्याच्या बहाण्याने शासनाकडून एक कोटी पन्नास लाख रुपयांचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून प्रकल्प अभियंता वेणी धरन ,यवतमाळ ,अमरावती येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिले काढण्यात आली . वास्तवात जलपर्णी आणि खोड काढण्यासाठी अत्यंत कमी खर्चात काम करून शासनाच्या रकमेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय केला आहे ! वेणी येथील रहिवाशी शेतकऱ्यांना सोबत घेऊन धरणाची पाहणी केली असता वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन आपण स्वतः केलेल्या चुकावर सदर अभियंता पांघरून घालत आहे ! धरणामध्ये जलपर्णी अचानक तयार झाली आहे का ? आज पर्यंत सदर अभियंत्याने आपल्या विभागाच्या वरिष्ठांशी बोलून वास्तव सत्य निविदा अंदाजपत्रक तयार करून तसा अहवाल वरिष्ठांना वेळेवर देण्याचे अपेक्षित असताना आता ऐन वेळेवर जलपर्णी काढल्याशिवाय नदीपात्रात पाणी सोडता येणार

नाही अशी बतावणी सदर अभियंत्याने अंदाजपत्रक बनवताना केली होती ! धरणामध्ये कमी प्रमाणात जलपर्णी असताना यांना ती दिसली नाही का ? धरणाचा मेन रस्ता सुद्धा अत्यंत दयनीय अवस्थेत आहे साधी दुचाकी सुद्धा या रोडने नेता येत नाही ! चार चार चाकी वाहनाचा विचारही न केलेला बरा रोडवर दगडांचे ढीग साचले आहेत सदर रोड केव्हा तयार केला याची चौकशी होणे गरजेचे आहे ! या वर्षी कॅनॉल दुरुस्तीच्या कामासाठी परराज्यातील जेसीबी मशीन चा वापर करून किती खर्च केला याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे ! गेली अनेक वर्षापासून भगत नामक अभियंता या प्रकल्पावर ठाण मांडून बसला आहे ! शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचा हा मोठा प्रकल्प नियोजना अभावी पांढरा हत्ती ठरतो आहे . जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी संयुक्त पथक पाठवून संबंधित जलपर्णी काढण्यासाठी वास्तवात किती खर्च लागला याची खातरजमा करून प्रत्यक्षात किती खर्च लागला याची चौकशी करून उर्वरित रक्कम सदर अभियंत्याकडून वसूल करावी तांत्रिक कारणे दाखवून नदीपात्रात पाणी सोडता येत नाही हे चुकीचे आहे ! मा .ना . इंद्रनील नाईक आमदार किसनराव वानखेडे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतः जातीने धरण प्रकल्पास भेट देऊन धरणातील जलपर्णी आणि काडीकचरा काढण्यासाठी किती खर्च वास्तवात लागला याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी . गेल्या दोन वर्षात धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्प अभियंत्याने काय उपाययोजना केल्या ! कॅनॉल दुरुस्तीवर किती खर्च झाला ! प्रकल्पाच्या रोडची दुरावस्था , नाईट वॉचमन , सिक्युरिटी स्टॉप विश्रामगृहाची अवस्था प्रकल्प अभियंता पूर्णवेळ कर्तव्यावर हजर राहतो का ? या सर्व बाबींची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे .दोन दिवसापासून सदर अभियंत्यास दूरध्वनीवरून संपर्क केला असता मी अमरावती , यवतमाळ येथे असल्याच्या बतावण्या अभियंता साहेब करीत आहेत चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून एक कोटी रुपयांच्या वर निधी काढून भ्रष्टाचार बाबीची योग्य ती चौकशी करून दोषी आढळल्यास सदर अभियंत्यावर कठोर कारवाईसाठी वेणी येथील नागरिक उपोषणास बसणार असल्याचे कळते . बॉक्स : लोअर पुस वेणी धरण प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत शासनाने खर्चाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यास किती भ्रष्टाचार झाला हे सर्व सामान्य जनतेस कळणार ! मागील वीस वर्षापासून सतत चुकीचे कामे करून सदर प्रकल्पाची प्रकल्प अधिकाऱ्यांनी वाट लावली आहे .कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सदर अभियंता यवतमाळ , अमरावती येथे वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी सल्लामसलत करून भ्रष्टाचाराचे प्रकरण रफादफा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे समजते . सदर अभियंता किती वर्षापासून या प्रकल्पावर कर्तव्यावर आहे ! कॅनवाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखोचा भ्रष्टाचार करून सुद्धा शेतकऱ्यांना आजपर्यंत झिरो ते त टेल पर्यंत पाणी मिळाले नाही हे विशेष तरी लोकप्रतिनिधी यांनी त्याबाबत साधी विचारणा सुद्धा केले नाही .शासनाच्या बदल्यांच्या नियम व अटी बाजूला सारत आणखी किती वर्ष हा अभियंता या प्रकल्पावर ठाण मांडून बसणार आहे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!