सामाजिक

माणुसकी जगायला शिकविणारे शिबिर‌.


शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


बीड हा राज्यभरात दुष्काळग्रस्त भाग म्हणून परिचित आहे. परंतु याच भागातुन माणुसकीची हिरवळ फुलवणारे एक शिबिर गेल्या दहा वर्षांपासून आयोजित केल्या जाते. आदरणीय संतोषजी गर्जे यांच्या संकल्पनेतून उभी झालेली आई संस्था यांच्या महत्त्वपूर्ण उपक्रमापैकी ‘भान तरुणाईचे’ शिबिर हा देखील एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यभरातील अनेक तरुण या शिबिरात सहभागी होतात. आयुष्याच्या पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करु पाहणाऱ्या या ध्येयवेड्या तरुणांना माणुसकी जगायला हे शिबिर शिकविते. या माध्यमातून सामाजिक संस्कार सहभागी तरुणांनावरती होतात. स्वतःला ओळखण्याची पारखण्याची वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःला पडताळून बघण्याची ही एक महत्वपूर्ण संधी असते. यामुळे विचारांची प्रगल्भता तर वाढतेच सोबतच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील प्रशस्त होतो‌. आयुष्याच्या प्रवासात आपल्यातलं माणुसपण कसं टिकून राहील याचा वस्तुपाठ शिबिरार्थ्यांन्या मिळतो. या शिबिरातील वेगवेगळे खेळ, उपक्रम तरुणांना विचार करायला प्रवृत्त करतात. या सर्वांमुळे फुलुन येतो माणुसकीचा बहर,सोबतच फुलते मैत्रीची बाग. मिळत जात एका एका प्रश्नाचं उत्तर. बदलतो जगण्याचा मार्ग. जसे शिबिर चालू होते तेव्हापासून सुटत जाते एक कोडं एक कोडं जे कधीच उलगडल नसतं जर या शिबिराचा भाग झालो नसतो तर. हे वाक्य येतं येणाऱ्या प्रत्येकांचा ओठांवर. आपल्यापेक्षा वर असलेल्या लोकांकडे बघण्याची सवय प्रत्येकाला असते आणि तो मानवी स्वभाव देखील आहे. परंतु कधीतरी आपण समजून घेतो का आपल्यापेक्षा अधिक संघर्ष करतं जगणाऱ्या लोकांच आयुष्य. आपल्याला का वाटत नाही माराव्या गप्पा एखाद्या शेतीकाम करणाऱ्या मजुरांशी,का वाटत नाही माराव्या गप्पा कचरा वेचक माणसांशी. का वाटत नाही समजुन घ्यावं आयुष्य स्मशानभूमीत इतरांच्या चितेवर पोटाची खळगी भरणाऱ्या माणसांचे जीवन आपण समजून घेणार आहोत का जर घेणार आहोत तर मगं कधी‌ ? हे शिबिर मात्र भाग पाडते इतरांचे आयुष्य समजुन घ्यायला. ज्यांचा संघर्ष आपल्यापेक्षा अधिक आहे आणि चेहऱ्यावर समाधान आहे. अशा लोकांच्या ठिकाणी उभं राहून घेता येतो अनुभव वेगवेगळ्या जीवनाचा. आणि त्या पुढे आपला संघर्ष वाटू लागतो राई सारखा‌‌. हे शिबिर देतं विश्वास कुठेही नंदनवन फुलवता येतं याचा. सांगते अर्थ जीवनाचा शिकविते गोष्टी माणूसपणाच्या. आयुष्याच्या प्रवासात आलेल्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य या शिबिरातुन मिळते. माणसा माणसा मधील अंतर कमी होवून. माणुस म्हणूनच आपली ओळख आहे. आणि तिचं सर्वांर्थाने आपली संपत्ती आहे हे उमगतं याचं शिबिरातुन. माणसाला नसावे रंग जातीचे,नसावे रंग धर्माचे,नसावीत रंग कुठल्याही सांप्रदायाचे. फक्त रंग असावा तो माणूसकीचा जो की,आपण खऱ्या अर्थाने माणसं आहोत हे सांगेल. सांगेल चार गोष्टी चांगुलपणाच्या! माणुसकी ही शब्दापुरती मर्यादित न राहता आपल्या जगण्यात असली पाहिजे. आणि हेच माणुसकी जगायला सांगणार हे शिबिर आपली माणुस म्हणून एक वेगळी उंची निर्माण करतं. असं जगणं समृद्ध करणारं शिबिर एकदा तरी अनुभवायला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!