सामाजिक
ऊसाची शेती,आणि शेतातील ऊस : जीवदान की जीवघेणी?उमरखेड तालुका प्रतिनिधी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
मागील बऱ्याच वर्षापासुन उमरखेड तालुक्यातील वंसत सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे उमरखेड, महागांव, पुसद, हिमायतनगर, हदगांव ह्या पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशा: कोलमडले आहेत . परन्तु मागील काही वर्षापासुन खाजगी कारखाने उमरखेड तालुक्याचा ऊस नेत असतानां देखील शेतकऱ्यांचा शिरावर टांगती तलवार सतत आहे . याचा दुष्परीणाम म्हणून या पाच तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्याची जखम फार खोलवर गेलेली असल्यामुळे जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस जाण्याची सुरक्षितता लाभणार नाही तोपर्यत्त उमरखेड तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी सतत तव्यावर भाजून निघत आहेत . या अनुषंगाने उसाची शेती करत असताना शेतातील ऊस बाहेर कसा काढावा याचं कुठलंही नियोजन या तालुक्यातील जाणकार मंडळी करत असताना दिसत नाही . ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना जेवढे कष्ट व पैसे लागतात त्यापेक्षा अधिक कष्ट व कुंचबना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी येत आहे जसे की ऊस तोडत असताना तोड ठेकेदार व मजूर आज रोजी प्रती एकरास ५ ते १० हजाराची वसुली करीत आहेत तसेच वाहतूक ठेकेदार ड्रायव्हर एन्ट्री व भोजन भत्ता असा एका ट्रिपला कमीत कमी एक हजार रुपये खर्च येत आहे त्याचप्रमाणे खाजगी कारखान्याच्या नोंदी प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत कींवा ऊस उत्पादकास ऊस तोडणी कार्यक्रम पत्रिका कारखान्याकडून माहेवारी प्रसिद्ध करून शेतकर्या पर्यन्त पोहचत नाही . त्यामुळे प्रत्येक कास्तकारास कारखाना ऑफिस भोवताल चकरा माराव्या लागतात . कारखान्याच्या उपलब्ध यंत्रणेबद्दल कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही . हे कमी की काय म्हणून ऊस शेतातुन वाहन बाहेर निघाल्यानंतर कारखान्यावर पोहोचेपर्यंत सर्वस्व जिमेदारी ही वाहतूक ठेकेदाराची असते परंतु मध्ये ऊस सांडणे, ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होणे, याचाही खर्च ऊस मालकावरच लादला जातो यावर काय अंकुश लावायचा याबद्दल कुठलेही धोरण कारखान्याकडून किंवा सरकारकडून ठरवल्या जात नाही त्यामुळे शेतकऱ्याची सतत लुटमार होत आहे यावर अंकुश ठेवण्यासाठी कारखाना गाळप संपल्यानंतर संबंधित ऊस उत्पादकाचे बयान नोंदवून संबंधितांकडून वसुली करण्यात यावी अशी धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याची नित्तांत आवश्यकता आहे म्हणून म्हणावसं वाटतं की ” उसाची शेती व शेतातील ऊस ” ही एक समस्या बनली आहे
प्रविण द. सुर्यवंशी
उमरखेड
९६८९३६९३४४