सामाजिक

भिम टायगर सेनेने जन आंदोलनाचा इशारा देताच शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात

सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)

उमरखेड (दिनांक 24 जुलै) नागपूर तुळजापूर हायवे हा उमरखेड शहरामधून जात असल्यामुळे जगदंबा देवी ते छत्रपती शिवाजी महाराज ते माहेश्वरी चौक ते दात चौक पर्यंत पावसाळ्यामध्ये रस्त्यात खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळणी झाली होती या विरोधात भिम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे आणि शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांनी वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमातून व सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे लेखी तक्रार देऊन सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
आठ दिवसात दुरुस्ती न झाल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

पण आज रोजी जगदंबा देवी रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, माहेश्वरी चौक ते नाग चौक पर्यंत रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून दुरुस्तीकरणाला सुरूवात केली आहे.

भीम टायगर सेनेने जन आंदोलन उभारण्याचा इशारा देताच खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संबंधित विभागाचे आभार मानून होणारे जन आंदोलन रद्द करण्यात आले.

अशी माहिती शामभाऊ धुळे यांनी यावेळी दिली. यावेळी यावेळी शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, जिल्हा उपाध्यक्ष करणदादा भरणे, तालुकाध्यक्ष कैलास कदम,संदीप विनकरे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!