उमरखेड येथे राज्य शिक्षण परिषद व ऑल इंडिया कवि संमेलन (मुशायरा) संपन्न

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
नुकताच उमरखेड येथे एकता संघटना तर्फे राज्य शिक्षण परिषद व कवी संमेलन (मुशायरा) घेण्यात आला. या कार्यक्रमात गुलीस्ताने गजल या काव्य संग्रहांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मा. आ. प्रकाश पाटील देवसरकर व कवी संमेलनाचे अध्यक्ष जमिर नजर हे होते.
कवि मुनीब हनफी, जावेद अनसारी, सुंदर मालेगावी, बाहेद अनसारी, कमर एजाज, नुरी अजीज, जमील साहीर, साबीर बसमती यांनी आपली कविता सादर केली. या कार्यक्रमाला गावातील कवि जमीर इक़ाम, परवेज हैदर यांनी कवीता सादर केली. सदर कार्यक्रमामध्ये राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सलीम आलंद सर, मोहम्मद परसुआले सर, सईद सर, आजमेरी मॅडम, बाँदर सर, काळे सर, आमीन चव्हाण, आमचे मार्गदर्शक दिलीप सफरे पाटील आमचे मार्गदर्शक यांना राज्य पुरस्कार देण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणुन सागर इंगळे ठाणेदार पोलीस स्टेशन, उमरखेड, जाधव जमादार, शेख खलिल , प्रशांत कदम , लांबटिळे सर, कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जाधव (शिक्षण अधिकारी लातुर) सतीष तायडे , सफरे पाटील, मजर खान अमिन सर, नितीन शिंदे पाटील, सिद्धार्थ बरडे सय्यद तहेजिर , मा. विलास चव्हाण , धिरज मस्के पाटील, बाळासाहेब ओझलवार, या कार्यक्रमाला पाहुणे म्हणुन लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथर खतीब, शेख अस्लम, गौस राज, जमीर खान, हाफीज सर, मुजीब सर, शेख रीहान, आखीब खान शेख आसिफ डॉ. आखिल यांनी परिश्रम घेतले. एकता संघटनाचे राज्य अध्यक्ष व कनविनर (मुशायरा) डॉ. गाझी असर यांच्या मार्गदर्शनामध्ये व त्यांच्या अत्याधिक मेहनतीने हा कार्यक्रम अशस्वीरित्या पार पाडला आहे.