शहर

बिटरगावच्या ठाणेदार यांच्या बदलीसाठी ढाणकी शहर एक वाजेपर्यंत कडकडीत बंद,,

, ( सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांना नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद),,

ठाणेदाराच्या बदलीसाठी ढाणकी बंदच्या हाकेला सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192



उमरखेड :- तालुक्यातील सर्वच बाबतीत आजूबाजूच्या खेडे गावातील जनतेला ढाणकी बाजारपेठ खरेदी व विक्रीसाठी महत्त्वाची मानली जाते असे महत्त्वाचे बिटरगाव (बु) पोलीस स्टेशन असून अशा ठिकाणी ठाणेदार म्हणून सुजाता बन्सोड यांची नियुक्ती काही महिन्यापूर्वी झाली असताना काही दिवसातच ढाणकी शहरातील एकूण सहा पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदनाद्वारे बदली करण्याची मागणी केली होती ही मागणी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती पण या निवेदनावर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नसल्याकारणाने पुन्हा याबाबतीत २९ नोव्हेंबरला पहिल्या निवेदनाला अनुसरून स्मरणपत्र दिले १ डिसेंबर शुक्रवार ढाणकी शहर बंदची हाक निवेदनाद्वारे केली होती व काही राजकीय पक्षांनी अवैध धंदे बंद करा या बाबीला आमचा पाठिंबा असून शहर बंदला आमचा पाठिंबा नाही असे सांगण्या आले. याला अनुसरून १ डिसेंबरला रोजी ढाणकी शहर बंदची हाक दिली असताना सर्वसामान्य जनतेने व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसत होते केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या बाबी नियमितपणे सेवा देताना दिसत होत्या तर हॉटेल ,कृषी केंद्र, किराणा, आणि इतर सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवून उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाची जबाबदारी नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे पण जनतेचे संरक्षण करणारी यंत्रणा जर कुचकामी ठरत असेल तर अवैध धंदे मटका अशा लोकांचे मनोबल उंचावून गेल्या अनेक वर्षांपासून खाकीतील निर्माण झालेला धाक वचक राहणार नाही अशीच परिस्थिती बिटरगाव(बू )पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिटमध्ये दिसून येत होती आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मतभिन्नता आहे याची जाण होत होती . मुख्यालयाच्या ठिकाणावरून शेवटच्या टोकावर असलेले पोलीस स्टेशन म्हणून बिटरगाव(बू )पोलीस स्टेशन आहे. हे पोलीस स्टेशन नेहमीच क्रीम पोलीस स्टेशन म्हणून राहिलेले आहे अनेक अधिकारी येथे येण्यासाठी आपली वर्णी लागावी यासाठी सक्रिय राहील्याचे बोलले जाते व सर्वसामान्य जनतेतून सांगण्यात येते .बिटरगाव(बू ) पोलीस स्टेशनची निर्मिती झाली तेव्हापासून प्रथमच महिला ठाणेदार म्हणून रुजू झालेल्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी प्रभार हाती घेतल्यानंतर मराठवाड्यातून येणाऱ्या गुटखा ज्यावर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. अशा बाबीवर धाड टाकून त्या बाबीस काही प्रमाणात प्रतिबंध घातला व वचक निर्माण केला व बीट मध्ये चालू असलेल्या शरीरास हानिकारक संबोधले जाणाऱ्या दारूचे अड्डे सुद्धा उद्ध्वस्त केले त्यामुळे सर्वसामान्य जनतेत एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून सर्वसामान्यांना वाटत असताना काही दिवसातच प्रभार स्वीकारल्यानंतर नेहमीप्रमाणे अवैद्य व्यवसाय आणि इतर समाजाला हानिकारक असलेल्या व्यवसायावर पडणाऱ्या धाडी कमी झाल्या व मटका, दारू,रेती तस्कर अशी व्यवसाय फोफावली त्यामुळे ठाणेदाराचा वचक कमी झाला की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.यामुळेच ढाणकी शहर बंदची हाक दिली होती आणि त्याला सर्वसामान्य जनतेने व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते

चौकट::–
ढाणकी शहरात कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही येथे सर्व धर्मीय लोक गुन्ह्यागोविंदाने एकत्रितपणे नांदतात शासकीय सेवा बजवणाऱ्या अधिकाऱ्याला जात नसतेच जनतेचे संरक्षण हेच त्याचे एकमेव ध्येय असते परंतु काही संधीसाधू कार्यकर्त्यांना हाताशी धरून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू असून नागरिकांनी या प्रकाराला बळी पडू नये ,पोलीस अधीक्षक साहेबांनी याविषयी तातडीने दखल घेऊन ठाणेदार सुजाता बन्सोड यांची तात्काळ बदली करावी.
जॉन्टी विनकरे,
जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी.

चौकट::__
जसे बिटरगाव पोलीस स्टेशनची निर्मिती झाली तसे प्रथमच ठाणेदाराच्या बदलीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले बहुदा ही पहिलीच वेळ असेल “गावकरी ते राव न करी” या म्हणीप्रमाणे. माननीय पोलिस अधीक्षक साहेबांनी शहरवासीयांच्या भावना लक्षात घेता सदर वादग्रस्त ठाणेदाराची तात्काळ बदली करून या प्रकरणाला पूर्णविराम दयावा .
ओम अंबादास खोपे
सामाजिक कार्यकर्ते

चौकट::_
शहरातील गणेश मंडळ आणि दुर्गोत्सव मंडळ तसेच शांतता कमिटीचे सन्माननीय सदस्य यांच्याशी उद्धटपणे वागणूक देणाऱ्या व अरेरावीची भाषा करणाऱ्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांची तात्काळ बदली करण्यात यावी.
उमेश योगेवार
नगरसेवक भाजपा.

चौकट::__
समाजामध्ये शांतता नांदावी व कुठल्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही असा सक्षम अधिकारी बिटरगाव(बू )पोलीस स्टेशनला दयावा आणि विद्यमान ठाणेदार यांची तत्काळ बदली करण्यात यावी
विजय वैदय
शिवसेना (ऊ.बा ठा. गट.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!