शैक्षणिक
•’मुलींना स्वसंरक्षणाचे धडे घराने व शाळेने द्यावे’-ऍड.अस्मिता टाकणखारे

•’माझी लेकबाळ व तिची सुरक्षितता’ या कार्यक्रमाचे जि.प.विडूळ नवी आबादी शाळेत शानदार आयोजन.
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
“दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे.त्यासाठी आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे घरातुन व शाळेतुनच मिळाले पाहिजेत असे रोखठोक प्रतिपादन ऍड.अस्मिता टाकणखारे यांनी केले.त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडुळ नवी आबादी येथे आयोजीत ‘माझी लेकबाळ व तिची सुरक्षितता’ या कार्यक्रमात बोलत होत्या.महिलांनी अत्याचाराच्या विरोधात धैर्याने उभे राहिले पाहिजे.त्यासाठी लागणारी संपूर्ण मदत आम्ही करु” असे आवाहन त्यांनी उपस्थित मुलींना व महिलांना केले.
बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुली तिच्या आईमध्ये सुरक्षितेबाबत जागृती व्हावी या उद्देशाने शाळेच्या वतिने सदर कार्यक्रमाचे सुरेख आयोजन नुकतेच करण्यात आले होते.त्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी उमरखेड न्यायालयाच्या प्रख्यात वकील ऍड.अस्मिता टाकणखारे व आरोग्य विषयक मार्गदर्शनासाठी शहरातील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ प्रिती जयस्वाल यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.
"आईंनी. मुलींना वरणभात शिजवायला नाही शिकवले तरी चालेल पण माणसं ओळखायला शिकवा.कारण आजचे बहुतांश पुरुष हे जनावराला पेक्षाही क्रुर होत आहेत.मुलींना प्रेमाचा अन् हवसेचा स्पर्श ओळखायला शिकवा.तिला अंगभर कपडे घालायला द्या.त्यांना खूप खेळु द्या अन् खूप शिकवा जेणेकरून त्या सशक्त व आत्मनिर्भर होतील." असे अत्यंत प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन डॉ.प्रिती जयस्वाल यांनी उपस्थित महिलांना केले.
सदर शाळेचा परीसर हा झोपडपट्टीतला असल्याने इथे महिलांना अधिक सजग होत आपल्या लेकीबाळीच्या सुरक्षितता जपता यावी .ह्यासाठी शाळेच्या सावित्रीबाई समिती व विशाखा समितीने सदर कार्यक्रमाचे यथोचित आयोजन केले होते.त्यासाठी शाळेतील मुलींसोबतच रोजमजुरी बुडवुन शेकडो महिलापालक, महाविद्यालय मुली व विडूळ नगरीतील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना धनगर,तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्या ज्योती कांबळे उपस्थित होत्या.तब्बल दोन तास चाललेल्या कार्यक्रमाचे समर्पक संचलन सखीसावित्री समितीच्या सदस्या तथा शिक्षिका सुवर्णा बाकडे यांनी केले तर आभार नागेश मिराशे यांनी मानले .या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक कोंडबा झाटे व सहाय्यक शिक्षक भास्कर मुंडेसह समितीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.अतिशय जळजळीत प्रश्नांना उकल करणारा यथोचित कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.