कृषि महाविदयालय उमरखेड येथील कृषिकन्यातर्फे माती परीक्षण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्य संपादक मो.9021233696
जिल्हा प्रतिनिधी सिध्दार्थ दिवेकर
उमरखेड:- (दिनांक 17 जून) माती परीक्षण केल्यास शेतकऱ्यांना पिक वाढण्यासाठी मदत होते.
शेतकऱ्यांना जमिनीची माहिती मिळते,जमिनीची सुपिकता कळते. जमिनीचा सामू कळतो, त्यानुसार शेतकरी जमिनी मध्ये योग्य पिक घेतो आणि योग्य खते जमिनी मध्ये टाकतो योग्य खते टाकल्यामुळे पिकांचे येणारे उत्पन्न वाढन्यास मदत होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षन करुणच पेरणी करावी असे आव्हान करीत कृषि कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शेतकरी बाधवांना आमची विनंती आहे की त्यांनी माती परीक्षन करुनच पेरणी करावी.
या माती परीक्षणासाठी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य एस. के. चिंतले, ग्रामिन कृषि कार्यनुभव कार्यक्रम आधिकारी ए. बी. ईगळे, वाय. एस. वाकोडे, ए. एस. राऊत, तसेच विषय तज्ज्ञ डाॅ. एस. बी. मातीखाये यांनी मार्गदर्शन केल तसेच माती परीक्षण करणे अत्यआवश्यक आसल्याचे मार्गदर्शन करणाऱ्या कृषिकन्या, उर्मिला सुभाष कांबळे, पायल कांबळे,अंकिता कदम, विधी बागडे, मयुरी वानखेडे, प्रांचिता हिरे, नवनिता राठोड, आचल ठक,सेजल राऊत यावेळी उपस्थित होत्या.