अमानपूरकरांत संताप : उपसले उपोषणास्त्रगावातील मुलभुत समस्या निवारणासाठी जिल्हा कचेरीसमोर पुकारला एल्गार

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड:-तालुक्यातील अमानपूर ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्यसह ग्रामस्थांनी दि 21 रोजी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे गावकऱ्यांच्या मूलभूत समस्येसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेले तालुक्यातील अमानपुर गावात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन व संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील संतप्त ग्रामस्थ व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी बेमुदत आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मागील अनेक महिन्यापासून गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे वृद्ध, आजारी व रुग्णांना नाहक त्रास गावातला अर्धा भाग उजेडात तर अर्धा भाग अंधारात कुचकामी सर्विस लाईन मुळे रात्री बे रात्री बत्तीगुल होत असते वितरणाकडे तक्रार केली असता ते केवळ आश्वासन परंतु उपाय होत नाही. लाईनमनकडे संपर्क

साधल्यास शनिवार रविवारचे कारण देत दुर्लक्ष होते. जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण पाणीपुरवठा योजना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे काम अद्याप अपूर्ण असून गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. महिलांना अजूनही पाण्यासाठी डोक्यावरती हांडे घेऊन लांब जावे लागते. गेल्या ५ वर्षांपासून रस्ते खराब असून विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी अडचण पावसाळ्यात गावात येण्याकरिता चिखलातून ये जा करावे लागतो
महागाव रोड ते अमानपूर गावापर्यंत ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर रस्ता तयार करणे, जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे या मुलभूत सुविधासाठी अमानपुर येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे व प्रशासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणास्त्र प्रारंभ केले आहे.

चौकट
मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच
संतप्त नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी यावेळी घेतली आहे.