अभय मस्के तहसीलदार यांचा नऊ महिन्यापासून विश्रामगृहावर ठीया सीसीटीव्ही फुटेज बंद असल्यामुळे रात्रंदिवस चालतो अंधा धुंद कारभार.

मुख्य संपादक मो. 9021233696
उमरखेड:-महागाव तालुक्यात विश्रामगृह येथे दोन शूट आहेत त्यामध्ये एक नंबरचे शूट हे व्हीआयपी अधिकारी महोदय यांच्यासाठी राखीव असतात तर दुसरे शूट आमदार प्रतिनिधी इतर बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांसाठी दिले जाते परंतु महागाव मध्ये विश्रामगृह दोन नंबरचे शूट हे अभय मस्के तहसीलदार महागावला सप्टेंबर 2024 पासून त्यांनी त्या रूमवर ताबा करून ठेवला आहे .त्यामुळे इतर अधिकाऱ्यांना महागाव विश्रामगृहावर थांबणे कठीण झाले आहे .तसेच सी सीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे तिथे अंधा धुंद कारभार चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अवैध गौण खनिज करणारे तस्करी विश्रामगृहावर ठिया मांडून बसत आहे .रात्रभर त्यांच्या कृतीला तेथील चौकीदार अक्षता कंटाळून गेले आहे रात्री बे रात्री तहसीलदार यांना त्यांच्या शासकीय गाडीने प्रायव्हेट व्यक्ती शासनाची गाडी चालवितात व रात्री कोणताही कर्मचारी संग न घेता प्रायव्हेट व्यक्ती संघ घेऊन रेती तस्करांकडून मोठ्या प्रमाणात वसुली ककरतात. रात्रभर वसुलीसाठी फिरत असल्यामुळे दिवसा तहसीलमध्ये तहसीलदार हजर राहत नाही ही मोठी शोकांतिका आहे. यापूर्वी असलेल्या ठिकाणावर अभय मस्के तहसीलदार असताना निलंबित झाले होते. त्यांना पनिशमेंट वर महागाव तहसील दिल्यामुळे त्यांनी पुनरावृत्ती करून भ्रष्टाचाराला पाठबळ दिल्यामुळे पूर्वी महागाव तहसील मध्ये रॉकेट घोटाळा, धान्य घोटाळा ,साखर घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामध्य अर्धी अधिकारी कर्मचारी यांना जेलची हवा खावी लागली अशी वस्तुस्थिती असताना त्याच मार्गाने हे अधिकारी वागत आहे .त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी महागाव तहसीलदार लाभावा अशी सर्व जनसामान्यांची मागणी आहे . एका महिन्याकरता आ ये एस अधिकारी तिवारी मॅडम हे महागाव तहसीलदार एक महिन्याचा प्रभार घेतला होता. त्यावेळेस तहसीलचा कारभार सुरळीत अगदी पारदर्शक पणे सुरू होता .अवैध गौण खनिज रेती वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले होते. त्यावेळी सर्वसामान्य लोकांना तहसीलमध्ये कास्तकारांची कामे मार्गे लागले होते. परतुन त्यांच्या प्रोफेशनल कालावधी संपल्यावर त्यांना इथून जावे लागले, त्यावेळेस अक्षरशः परिसरातील लोकांना दुःख झाले .परंतु त्याला नाईलाज ते आ ये एस असल्यामुळे त्यांना तहसीलदार म्हणून राहता येत नाही. त्यांना अनुभव घेऊन जावे लागते, त्यानंतर अभय यांनी आभास निर्माण केला आहे. त्यांनी सरकारी कॉटवर न राहता विश्रामगृहावर थाटामध्ये नऊ महिन्यापासून विश्रामगृहातील दोन नंबर च्या रूमवर अतिक्रमण करून ठेवले आहे. वरिष्ठ व लोकप्रतिनिधी यांच्याकडे लक्ष देतील का ?हा जनतेमध्ये प्रश्न पडला आहे सीसीटीव्ही फुटेज चालू होतील का ?यासाठी कार्यकारी अभियंता यांनी विश्रामगृहावरील सीसीटीवी लवकरात लवकर सुरू करू व दोन नंबरची रूम खाली करण्याकरता वरिष्ठांकडे तक्रार केली आहे . असे आमच्या प्रतिनिधीला सांगितले तसेच खान सामा व चौकीदार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यावर गैर कृती होणार नाही असे आपले मत मांडले.