Uncategorized

जिजाऊ रथ यात्रेचे उमरखेड शहरात दणदणीत स्वागत मुस्लिम समाजासह महिलांचा प्रचंड सहभाग

जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणेने औदुंबर नगरी दुमदुमली

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- मराठा सेवा संघाच्या वतीने देशभरात आणि अलीकडे महाराष्ट्रात जातीत धार्मिक तेढ वाढत असल्यामुळे प्रबोधनाची पेरणी करण्याच्या उद्देशाने समता, बंधुता आणि स्नेह वाढवण्यासाठी संत महापुरुषांचे विचार समाजात रुजावे जाती-धर्माच्या भिंती तोडून मानवता हा धर्म मानावा या उद्देशाने जिजाऊ रथयात्रा प्रेमाचा आणि एकीचा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्रभर जात .भोसले गडी वेरूळ ते लाल महाल पुणे येथून बहुजन समाजाला जोडण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा विदर्भाच्या उमरखेड तालुक्यात काल रात्री आठ वाजता नाक चौक येथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी बहुजन समाजातील व सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषता मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहामध्ये जिजाऊ रथयात्रेचे स्वागत केले . मराठा सेवा संघ व 33 कक्षासह उमरखेड शहरातील सर्वच बहुजनवादी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तथा जिजाऊ ब्रिगेडच्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीने व ढोल पथकाच्या वाद्याने जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करण्यात आले .नागचौकापासून, बस स्टॅन्ड, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून या जिजाऊ रथयात्रेचे सभेमध्ये रूपांतर जिजाऊ सांस्कृतिक भवन येथील प्रांगणात झाले . यावेळी विचार पिठावर प्रा. अर्जुन तनपुरे, माजी प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक, डॉ. गजानन पारधी प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, मांगीलाल चोपडा मराठा सेवा संघ हरियाणा, केंद्रिय कार्यकारीणी सदस्य शाहीर पाटील,उमाकांत उफाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड, विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप, जिल्हाध्यक्ष सुरेश कदम, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव सरोज देशमुख, उपस्थित होत्या .


या सभेला मार्गदर्शन करताना प्रा . अर्जुन तनपुरे यांनी मराठा सेवा संघाची भूमिका स्पष्ट केली . मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेतून बहुजन समाजातील मराठा जोडो अभियानातील ही रथयात्रा कशासाठी व का याचे विविध उदाहरण देऊन शिक्षण सत्ता हस्तगत करून मराठा सेवा संघाच्या चळवळीमुळे हजारो डॉक्टर, इंजिनियर सह प्रशासकीय अधिकारी चळवळीच्या विचाराने तयार झाले . लग्नात वायफळ खर्च न करता तो खर्च मुलीच्या शिक्षणावर खर्च करा, जिजाऊ रथ यात्रेचे फलीत खूप मोठे असून गावागावात आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी त्यांनी विशद केले . मराठा सह इतर समाजाला जोडणे आवश्यक असून जैन समाजाने घेतलेल्या ठरावाचे ही त्यांनी उदाहरण देऊन अभिनंदन केले . जैन समाजाचा आदर्श सर्वच बहुजन समाजाने घेणे आवश्यक असून अल्पसंख्याकांनी समता, समंता, बंधुता या तत्त्वावर डॉ. आंबेडकरांच्या घटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकारावर हा देश चालत असल्यामुळे त्यांच्या पाठीशी भक्कम असल्याचेही यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून जिजाऊ रथयात्रेची भूमिका मांडली . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कदम यांनी तर संचलन आनंद देशमुख तर आभार शिवाजीराव वानखेडे यांनी मांडले

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व जिजाऊ भक्त शिवभक्त त्याचा मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!