शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या ! मराठा मावळा संघटनेचा बैलगाडी मोर्चातून तहसीलदारांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील पर्यंत बैलगाडी मोर्चा
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
” उमरखेड :- अशी कशी मिळत नाही कर्ज माफी मिळालीच पाहिजे ” या घोषणेने शहर दुमदुमून छत्रपती शिवाजी महाराज ते तहसील कार्यालयापर्यंत मराठा मावळा संघटनेने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागणी सह विविध मागण्याच्या संदर्भात बैलगाडी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदनातून मागणी केली आहे यावेळी दहा ते पंधरा बैलगाड्या सह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून, प्रत्यक्षात मात्र हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्यांनी बळीराजावर अन्याय केला आहे. आजही राज्यातील लाखो शेतकरी कर्जबाजारी असून, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनीअधिकृतरीत्या जाहीर केले आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मात्र, दुसरीकडे सिंचन घोटाळ्यातील सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांचा अपहार झाला असून, हे पैसे जनतेच्या कष्टाने भरलेल्या करातून गेले आहेत.
. सिंचन घोटाळ्यात गेलेले पैसे शासनाने परत मिळवावेत व त्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी करावा. नाही तर

जर शासनाने कर्जमाफीस नकार दिला, तर या घोटाळ्यातील जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा.तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तातडीने शाश्वत आर्थिक मदतीचे धोरण राबवावे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्या कष्टांचे चीज होण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा, आम्हाला आपल्या हक्कांसाठी व्यापक आंदोलन करण्यास बाध्य व्हावे लागेल. असा इशारा मराठा मावळा संघटनेचे प्रमुख संतोष चव्हाण, गजानन देशमुख,अरविंद चव्हाण, रमेश चव्हाण संदीप कदम, वैभव सूर्यवंशी अमोल कदम, वैभव दवणे, गोटेवाड, पंजाब चव्हाण, रेखाताई गायकवाड, स्वरांजली वाघमारे सह मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होते