सामाजिक

स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

(स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्या अन्यथा पार्थिवाचे कार्यालयासमोर दहन करू निवेदनातून इशारा)

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड :- (दि.18 डिसेंबर) तालुक्यातील गट ग्रामपंचायत टाकळी अंतर्गत येणाऱ्या राजापूर वाडी येथील नागरिकांना स्वातंत्र पूर्व काळापासून गावातील मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाम किंवा अंत्यविधीसाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याकारणाने येथील सर्व ग्रामस्थांनी दि 18 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्मशानभूमीच्या मागणीसाठी निवेदनातून इशारा देण्यात आला.राजापूर वाडी येथील मरण पावलेल्या लोकांना मरणानंतरही नरक यातना सोसाव्या लागत असल्याने गावात हक्काची अंत्यविधी करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याने गावात एखादा व्यक्ती मरण पावल्यावर त्यांच्या अंत्यसंस्कार कुठे करावा हा सर्वात मोठा प्रश्न ? येथील नागरिकांना सद्यस्थितीत भाषवत आहे.पावसाळा हिवाळा किंवा उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये गावात अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागा नसल्याकारणाने उमरखेड येथे सात किलोमीटर दूर मृतदेहासह नागरिकांना प्रवास करून उमरखेड येथील मोक्षदामात मृतदेहाचा अंत्यसंस्कार करावा लागतो यामुळे येथील नागरिकांना आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. यामुळे नागरिकांनी शासनाच्या मालकीची असणारी खंड एक मध्ये शेत सर्वे नंबर 119 मधील 0.20 हेक्टर आर पडीत जमिनीवर गावातील मृत्यू पावलेल्या लोकांचा अंत्यसंस्कार गेल्या पंधरा वर्षापासून गावातील नागरिक करीत आहेत.सदर जागा सर्व धर्मीयांना मोक्षधामास मिळावी यासाठी ग्रामपंचायत मधील सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी अधिकृत ठराव आम सभेत पास करून सदर जागा मिळण्यासाठी गावकऱ्यासह आपल्याकडे अनेक वेळा प्रशासनाला निवेदनामार्फत मागणी केली आहे.
राजापूरवाडी येथील ग्रामस्थांची मागणीची दखल घेत उपअधीक्षक भूमी अभिलेख उमरखेड यांना सदर जागेची मोजणी करून प्रत या कार्यालयास तात्काळ सादर करण्याकरिता आदेश दिले होते. त्यानंतर 25 जुलै रोजी तलाठी ,सरपंच ,सचिव यांच्या उपस्थितीत जागेचा पंचनामा मोजणी केली होती त्यानंतर अद्यापही सदर मोजणीचा अहवाल मोजणी सीट सदर ग्रामपंचायत व गावातील नागरिकांना आजपर्यंत मिळाली नाही त्यामुळे वरील गांभीर्य विषयी तात्काळ लक्षात घेऊन सदर जागेचा सातबारा तात्काळ ग्रामपंचायत टाकळी राजापूर वाडी यांच्या नावाने येत्या पंधरा दिवसात करण्यात यावा अन्यथा गावातील मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृत्यूदेह आपल्या कार्यालयासमोर जाळण्यात येईल. व कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचे निवेदनातून इशारा दिला.
यावेळी राजापूर टाकळी येथील सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!