Uncategorized

आचारसंहिता पालन न करणारे यांच्यावर उपविभागीय अधिकारी काय कारवाई करणार ?

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून आदर्श आचारसंहिता जारी केली आहे. एसडीओ तथा निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांनी १७ ऑक्टोंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत घेऊन आचारसंहितेचा पालन करा असे नुसतेच बोलले की काय असे नागरिक प्रश्न करत आहे .कारण आज ही उमरखेड मतदारसंघात मात्र आचारसंहितेचा भंग झाल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरातील चौका-चौकात राजकीय नेत्यांचे बॅनर झळकत आहे .
मतदारसंघात आपल्या नावाची चर्चा होण्यासाठी इच्छुक नेत्यांकडून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली दिसत आहे .उमरखेड मतदार संघात आचार संहिता लागून जवळपास तीन दिवस झाले. परंतु आदर्श आचार संहिताचे उल्लंघन करणारे विविध पक्षांचे बॅनर पोस्टर भिंत पोस्टर. अनेक तीन चाकी ऑटोला ,फोर व्हीलरला चिपकवलेले आहेत तसेच आज रोजी उमरखेड तालुक्यातील साखरा येथे घराच्या भिंतीवर भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार यांचे पोस्टर चिपकलेले आहे याकडे उपविभागीय अधिकारी उमरखेड तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमरखेड व माहिती कार्यालय माहिती अधिकारी यांचे प्रामुख्याने दुर्लक्ष होत आहे.तेव्हा बेकायदा बॅनर्सवर व पोस्टरवर कधी आणि काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!