सामाजिक कार्यकर्ता बसवेश्वर क्षीरसागर यांनी दिले सीओला नोटीस

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी असुन, उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा शासनाने मंजुर केलेल्या जागेमध्ये उभारावा म्हणून औंदुबर सृष्टी समिती यांनी वि. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथे लोकहित याचीका क्रं. ८/२०२२ ही दाखल केली होती. त्यामध्ये आमचे पक्षकार हे सदस्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा कृति संघर्ष समिती उमरखेड चे अध्यक्ष देविदास शहाणे यांनी सदर याचिकेत स्वतः हजर राहुन म्हणणे मांडण्याची संधी मागितली. वि. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी दि. १६-०३-२०२२ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा कृति संघर्ष समिती उमरखेड चे अध्यक्ष देविदास शहाणे यांना प्रकरणात पक्षकार करण्यात आले.
त्यापुर्वी आपण दिनांक २७-०१-२०२२ रोजी नगर परिषद उमरखेड या ठिकाणी सभा घेवुन महागांव रोडवरील सारडा पेट्रोल पंपास लागुन असलेली नगर परिषद मालकीचे जागेत असलेले जुने क्षतीग्रस्त झालेले चार गाळे पाडुन त्या ठिकाणी व गाळ्याचे पाळीमागे खुल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यास प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन दि. २९-०४-२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयात दुपारी ४-०० वाजता पुतळा समितीचे अध्यक्ष श्री. अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ व इतर सहा सदस्य यांचे उपस्थितीत सभा झाली. त्यामध्ये आपण सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली. आपण सदर सभेमध्ये जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पुतळा उभारण्याकरीता आवश्यक असलेले सर्व विभागाच नाहरकत पत्र सभेच्या दिनांक २९-०४-२०२२ पासुन ७ दिवसाचे आत सादर करतो असे सांगितले व जिल्हाधिकारी यांनी तसे आपणास सर्व दस्त ७ दिवसाचे आत सादर करण्याबाबत कळविले.
मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दि. २९-०४-२०२२ रोजीच्या सभेनंतर जनहित याचिका क्रं. ८/२०२२ ही सुनावणी करीता वि. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे श्री. सुनील सुक्रे साहेब व श्री. जी.ए. सानप साहेब न्यायमुर्ती उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांचेसमोर सुनावणी करीता लागली असता आपण त्यांचे समोर दि. २९-०४-२०२२ रोजीचा प्रस्ताव दाखल केला व शपथेवर न्यायालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा नगर परिषदेचे जागेवर बसविण्याचे दृष्टीने ७ दिवसात सर्व नाहरकत प्रमाणपत्र सादर करतो असे कळविले. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा लवकरात लवकर उभारतो असे आश्वासन दिल्यामुळे वि. न्यायमुर्तीनी तुमचेवर विश्वास ठेवुन सदर प्रकरण निकाली काढले.
परंतु मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांना दि. ०८-०६- २०२२ रोजी आश्वाशीत केल्याप्रमाणे व दिनांक २९-०४-२०२२ रोजी घेतलेल्या ठरावाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उमरखेड शहरात बसविण्याच्या अनुषंगाने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. आपण मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांना आश्वाशीत केल्याप्रमाणे कोणतीही कृती केली नाही. त्यामूळे आपण वि. उच्च न्यायालयाचे आदेशाचा अवमान केला आहे. याशिवाय आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे आश्वारुढ पुतळयाचे अनावरण करण्याची कोणतीही तयारी झालेली नसतांना आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा बोलावुन बंदीस्त ठेवला आहे. तोही एकप्रकारे छपत्रती शिवाजी महाराज यांचा व जनतेचा अपमानच आहे.
सबब तुम्हास कळविण्यात येते की, सदर सुचनापत्र मिळाल्यापासुन ६० दिवसाचे आत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा उमरखेड शहरात आपण वि. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांना आश्वाशीत केलेल्या जागेवर बसविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा आपण मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांना चुकीची माहिती देवुन उमरखेड शहरवासियांच्या व महाराष्ट्रातील शिवभक्ताच्या भावना दुखावल्या प्रकरणी आपल्या विरुद्ध कायदेशिररीत्या अवमान याचिक दाखल करण्यात येईल. त्यामूळे होणाऱ्या खर्चास, नुकसानीस व कायदेशिर परिणामास तुम्हीच जबाबदार राहाल.