बस स्थानका खालील बाजुच्या अर्धवट राहीलेल्या नालीचे काम पुर्ण कधी होणार ?

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
मागील बऱ्याच दिवसा पासुन बसस्थानकाला लागुन व तसेच दयानंद कॉलीनी मधुन जात असलेली मोठी नालीचे काम समंधीत ठेकेदारानी अर्धवट करून सोडुन दिले होते ते काम पुर्ण करण्या करता नगर पालीका प्रशासनाला काम पुर्ण करण्याकरीता कधी जाग येणार अश्या प्रकारे प्रश्न उपस्थीत होत आहे. तसेच त्या नालीची साप सफाई न केल्यामुळे गाळ दुगंधी झाली असुन नागरीकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे मुळ कारण असे की , पावसाळा येण्याच्या पुर्वी नालीची साफ सफाई कश्याप्रकारे केल्या जाते घाण व गाळ तसाच मध्ये राहतो थातुर मातुर कामे करुण देयके काढुन ताव मारला जाते अश्या प्रकारे कामे केली जातात त्यामुळे डेंगु , मलेरीया , हिवताप अश्या रोगाना निमत्रंन देणे नव्हे काय? दयानंद नगर वाशीयाना दुरगधीचा सामना करावा लागत असुन अर्धवट नालीचे काम पावसाळ्या पुर्ण करण्याची मागणी दयानंद कॉलीनील नगरवाशी करीत असुन बस स्थानकाच्या भींतीच्या बाजुचा रोड पुर्ण करून द्यावा नागरीकाना ये जा करण्याकरिता सोपे होईल.