उमरखेड फळ विक्री त्यांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ?

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड शहरासह तालुक्यात फळ विक्रेते आपल्या बुद्धी कौशल्याने फळांना पिकविण्या करिता केमिकल पदार्थाचा वापर करून केळी , आंबे, सफरचंद तसेच फळांचा राजा असलेला आंबा इत्यादी इत्यादींना वापर करून पिकवीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तसेच लहान मुले सदर केमिकल मध्ये पिकविल्या गेलेल्या फळामुळे बिमार पडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य तसेच लहान थोरापर्यंत आज आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या फळांपासून फायदा तर मिळत नसून परंतु खाल्ल्यानंतर अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहेत . त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर लगेच दवाखान्यात उपचारा करिता जाण्यास बाद्य व्हावी लागत आहेत .आज वास्तविक पाहता टरबूज सुद्धा उपयुक्त नसून टरबुजा मध्ये इंजेक्शन टाकून सदर टरबूजास लाल व गोड बनविण्या करिता अनेक केमीकलचा वापर फळ विक्रीते करीत असून त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून सदर नागरिक फळ खाल्ल्यामुळे दुरुस्त होण्या ऐवजी आपले आरोग्य बिघडवून घेत आहेत तसेच फळ विक्रीत्यावर नगरपालिके तर्फे कसल्याही प्रकारची चौकशी न होता दिन दिक्कतपणे केमिकल वापरून फळांची विक्री फळ विक्री ते करीत आहेत. सदर फळ विक्रेत्याच्या फळांची विक्री परीक्षण विभागातर्फे करून त्या केमीकल युक्त फळाची चाचपाणी करून ते कमीकल युक्त असल्यास त्यांना दंड आकारण्यात यावा तसेच नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या विक्रेत्यांना त्यांचा माल जप्त करून जनसामान्य जनास सहकार्य करावे ही भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच प्रशासन सदर बाबीकडे दुर्लक्ष करते की, कारवाही करते याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.