नगरपालिकेच्या करवाढीमुळे नागरिकात असंतोष आक्रोश.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड नगरपालिके तर्फे सर्वे करून कर आकारणी भरमसाठ वाढविल्या गेली. वास्तविक पाहता आजच्या घडीला सर्वसामान्य ते मध्यमवर्गीय उच्चवर्गीय यांना एकाच नियमा खाली आणून नगरपालिकेने भरमसाठ कर वाढ केली. वास्तविक पाहता दरवर्षी प्रमाणे दहा टक्के ची करवाड देण्यास नागरिकांमध्ये सहकार्याची भावना जोपासल्या जाते परंतु या सुलतानी नगरपालिकेने सर्वेच्या नावाखाली सर्व नागरिकांना एकाच फूटपट्टीत घेतल्या असून भरमसाठ कर वाढ करून नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांनी विशिष्ट प्रकारचा टेबल टाकून सांगितले की, एकंदरीत स्क्वेअर मीटर नुसार तुम्हाला टेबलच्या अनुषंगाने एवढी कर आकारणी लागली आहे. परंतु आम्ही ही आकारणी न घेता आमच्या नियमानुसार अशा प्रकारे आम्ही तुमची कर वाढ करीत आहोत परंतु नगरपालिकेने नागरिकांच्या डोळ्यात धुळ झाकून दुप्पट किंवा तिप्पट पटीने कर आकारणी जबरदस्तीने नागरिकावर लादली आहे. त्यामुळे आपला संताप व्यक्त करीत आहे . तसेच कर आकारणी कमी करण्याकरिता शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपले निवेदन नगरपालिकेस सादर केले परंतु आज पर्यंत नगरपालिकेकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, यापेक्षा भाड्याच्या घरातबरे परंतु या कुंभकर्णी झोप घेतलेल्या प्रशासनाच्या लक्षात का बरे येत नाही असा टाहो नागरिक सर्वसामान्य गोरगरीब जनता व्यक्त करीत आहे . त्यामुळे आधीच हैरान , बेजार, परेशान झालेल्या नागरिकांना नगरपालिके तर्फे सहकार्य न करता नागरिकाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नगरपालिका प्रशासन करीत आहे . तरी वरिष्ठांनी सदर नागरिकांच्या भावना लक्षात घेता भरमसाठ कर आकारणी केलेल्या प्रशासनास तंबी देऊन गोरगरिबांची तसेच मध्यमवर्गीय व व्यापारी वर्गाची आकारणी कमी करून त्यांना सहकार्य देऊन आपल्या नगरपालिकेची वसुली करावी जेणेकरून प्रशासनालाही पैसा उपलब्ध होईल व नागरिकांचे समाधान सुद्धा होईल आज महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केलेली उमरखेड नगरपालिका हिचे वर्चस्व कमी न होऊ देता एक नंबर वर उमरखेड नगरपालिका कशी जाईल याचा विचार करून जनतेसोबत सहकार्याची भावना जोपासून नगरपालिकेला प्रथम क्रमांक वर नेण्याकरिता प्रशासनाने लक्ष घालून तसेच कर आकारणी कमी करून जनतेसोबत न्याय द्यावा तसेच वरिष्ठांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या नगरपालिकेला प्रशासनाला मार्गदर्शन करून त्यांना कर आकारणी कमी करण्याबाबत निर्देश देऊन नागरिकांना न्याय द्यावा अशी भावना व्यक्त केल्या जात आहे.