Uncategorized

हिंगोली लोकसभा मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करणारे खासदार हेमंत पाटील- चितांगराव कदम

भव्य नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला मिळवून दिला रोजगार

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड (दि.२८ ) अवघ्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला हिंगोली लोकसभा मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम खऱ्या अर्थाने खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. हिंगोली लोकसभेचा सर्वांगीण विकास या ध्येयाने खासदार हेमंत पाटील यांनी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उमरखेड- महागाव विधानसभा क्षेत्रातील अनेक रखडलेले प्रकल्प हाती घेऊन मार्गी लावले आहेत. यामध्ये पैनगंगा नदीवरील सात उच्च पातळी बंधारे, कारखेड -वाटेगाव पूल किंवा आपल्या तालुक्याची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना सुरु करणे अश्या प्रकारच्या विविध विकास कामाच्या माध्यमातून खासदार हेमंत पाटील यांनी आपले कार्य सिद्ध केले आहे असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम यांनी केले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या एकमेव उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून लोकसभा मतदारसंघात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २७ रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर तर दि. २८ जानेवारी रोजी उमरखेड येथील जि. प. हायस्कुलच्या मैदानावर या भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला आणि जवळपास दीड हजार च्या वर तरुणांना मुंबई, पुणे, नागपूर, छ .संभाजी नगर, अमहदनगर येथील टाटा,किया मोटर्स, महिंद्रा सीआयए, SBI, ऍक्सिस, पिरॅमल, संजीव ऑटो यासह ७० नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे . मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, आपल्या देशात २० ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.ते शिक्षण घेतात आणि नोकरी नाही म्हणून बेरोजगार राहतात परंतु बेरोजगारी का वाढत आहे याचा कधी गांभीर्याने विचार झाला आहे का? आपण जे शिक्षण घेतो ते केवळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहे .आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांना टिकायचे असेल तर त्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेतले पाहिजे त्यांच्यासाठी जगात नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध आहेत. कुशल कामगारांसाठी असंख्य जॉब उपलब्ध आहेत. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याला आपल्यामधील कौशल्य दाखवावे लागेल. तरच आपण आपला आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करू .
यावेळी बोलताना यवतमाळ जिल्हा भाजपा समन्वयक नितीन भुतडा हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, खासदार हेमंत पाटील हे उमरखेड- महागाव विधानसभा मतदारसंघाचे भग्यविधते आहेत कारण त्यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्याची आणि खऱ्या अर्थाने उमरखेड- महागाव तालुक्याची कामधेनू असलेला आणि मागील अनेक वर्षांपासून बंद असलेला वंसत सहकारी साखर कारखाना सुरु करून या हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली. हि खूप मोठी बाब आहे.
कार्यक्रमाला गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी सुद्धा उपस्थित तरुणांना मागर्दर्शन केले त्या म्हणाल्या कि, कोणतेही काम छोटे नसते आपल्या भागातील तरुणांनी आपला गाव आपला तालुका , जिल्हा सोडून बाहेरचे जग पाहावे, त्याचा अभ्यास करावा आणि जगाच्या कोपऱ्यात कुठेही काम करण्याची आपली तयारी ठेवल्यास त्यांना कामाला आणि नोकरीला कमी पडणार नाही . परंतु आपल्याकडे यापेक्षा उलट घडताना पाहायला मिळाते तरुणांना आपल्या गावात आणि तालुक्यात काम पाहिजे असते पगार पण जास्त आणि काम कमी असे कसे होईल बर , तुम्ही तुमच्या मनातील संकुचित विचार आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला मग तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार आणि या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही मुंबई पुणे येथील नामवंत कंपन्या तुमच्या दारात आणल्या आहेत. आता गरज आहे तुम्हाला दोन पावले पुढे येऊन आपले आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार करण्याची चला उठा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका या स्वामी विवेकानंद यांच्या उक्तीप्रमाणे झपाटून कामाला लागा.
या मेळाव्याला यावेळी भाजपा जिल्हाप्रमुख नितीन भाऊ भुतडा, संपर्कप्रमुख चितांगराव कदम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, राजू गिरी महाराज असोलीकर, युवासेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील हडसणीकर, तालुकाप्रमुख संतोषराव जाधव, तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिरासे, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश कदम, महागाव तालुका प्रमुख राजूभाऊ राठोड, तालुका संघटक कपिल पाटील चव्हाण, शहर प्रमुख अतुलभाऊ मॅड, माजी पंचायत समिती सदस्य गजानन सोळंके, उप तालुका प्रमुख गजाननराव सुरोशे, सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ बिजोरे, बंडूभाऊ चिंचोलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुनीताताई देशमुख, दुर्गाताई भारती, आशाताई गव्हाणकर, आशाताई कलाणे, डॉ. स्वातीताई वाठ, माजी सभापती सविताताई कदम, रावसाहेब महाराज, बबनराव कदम, तालुकाप्रमुख हिमायतनगर रामभाऊ ठाकरे, हदगाव ता.प्र विवेक देशमुख, युवा सेना शहरप्रमुख जस्मिन घनघाव, विलासराव हरकरे, शिवराज कदम, भारतराव पाठक, निलेश शेलार, गोपाल राजुरकर, युवासेना हदगाव ता.प्र. अक्षय पवार, सर्व कपन्यांचे समन्वयक, शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यासह हजारो बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!