सामाजिक

शेतकऱ्यांनी सिल्क आणि मिल्क ची सांगड घालावी

डॉ . विजयराव माने

भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराचे वितरण १९ शेतक ऱ्यांचे सन्मान

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण व कृषी महाविद्यालय उमरखेड चे कृषी विज्ञान मंच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला उपक्रमातर्गत सहकार महर्षी, शिक्षण महर्षी , लोकनेते भाऊ साहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ जानेवारी रोजी कृषी महाविद्यालय (कुपटी जवळ ) उमरखेड येथे कर्तृत्ववान शेतकरी व शेती निष्ठावंतांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव मुळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती तर उद्धघाटक म्हणून एल . बी . कलंत्री माजी संचालक रेशीम संचालनालय, महेद्र ढवळे, माजी आमदार विजयराव खडसे, प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार, कल्याणराव माने, डॉ प पार्लावार, विलास शिंन्द, शिवाजीराव माने ,समाधान धुळधुळे, गंगाधर बळवंतकर, अशोकराव वानखेडे ,रवि शिलार, बाळासाहेब काळे,सुदर्शन ठाकरे, डॉ . वि . ना . कदम, सुरेश भराडे, बाळासाहेब रास्ते पाटील नंदकिशोर शर्मा हे होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात डॉ विजयराव माने यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की मिल्क ला सिल्कची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास होईल आणि शेतकरी कुटुंबास हमखास उत्पन देणारे रेशीम उद्योग आपल्या तालुक्यात सुरू व्हावे यासाठी

उमरखेड,महागाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव यांच्या सहयोगाने ५०० एकर पेक्षा अधिक रेशीम शेतीची लावगड केल्यास उमरखेड तालुक्यातील शेतकरी बांधव साठी सिल्क रेलींग सेन्टरची स्थापना होऊ शकते कारण १ सिल्क रेलींग सेन्टर उभारण्यासाठी ५०० एकरची गरज असते . अशी त्यांनी माहीती दिली तालुक्यात 200 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड झाली आहे आणि कृषी महाविद्यलया तर्फे १०० एकरची नोंदणी झालेली आहे लागवड केलेल्या तुतीची उत्पादित केलेल्या मालाची विक्री त्यांना पर राज्यात करावी लागत आहे याबाबींकडे लक्ष वेधून रेशीम उद्योगासाठी मोठी बाजारपेठ आपल्या तालुक्यात नव्ह्याने सुरू व्हावी यासाठी सहकारी सस्थेमार्फत संशोधन करून मोठी बाजारपेठ उपलब्ध करणार असल्याचे सांगुन उमरखेड तालुक्यात अमुल च्या माध्यमातुन २३०० लीटर पासुन १ लाख लीटर च्या वर दुध निर्मिती करण्यासाठी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान चा मोलाचा वाटा असुन “उमरखेडी ज्वारी” म्हणून कृषी महाविद्यालयाच्या वतीने ज्वारीचे चांगले वान आम्ही शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्याच्या पिकाच हिस्त्र प्राण्यापासुन संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या गुणधर्माच्या श्वान ( कुत्रे ) तमीळनाडू, मध्यप्रदेश, तेलगना इत्यादी प्रदेशातुन आणुन वन्य प्राण्यापासुन शेतीचे संरक्षण होण्याच्या दुष्टीकोनातुन यावर भाऊसाहेब माने प्रतिष्ठाणचे कार्य अविरत सुरु आहे व राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्कारांना रेशीम उद्योग उत्पादीत शेतकरी सखाहरी जाधव यांनी सत्काराला उत्तर देतांनी सांगितले रेषीम उद्योग करणारा शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही गटशेती करून तुतीची लावगड करणारा शेतकरी पहील्या वर्षी माडी तर दुसऱ्या वर्षी गाडी नक्की घेईल अशी तुतीची फायदाची शेती आहे असे मनोगत व्यकत केले यावेळी अनिल किरणापुरे भाजीपाला उत्पादक राहुल निनावे दुध उत्पादक ,प्रियका फाटे पुरक उद्योग , सुशिला बिडकर, नौशाद खान, हनुमंत केंद्रे हिराबाई शेटे फुलशेती, डॉ . संजय काकडे , डॉ . उज्वल राऊत, शिवाजीराव माने यांनी आपला शेतीचा अनुभव सांगितला अध्यक्षीय भाषणात डॉ . मुळे यांनी दुधापासुन व्यवसाय केले तर शेती सुलभ होईल सेंद्रिय शेतीचा वापर केला तर जमिनीसोबत मानवाच शरीर सुदूढ होईल यात काही शंका नाही असे उदगार काढले
या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थीत होते कार्यक्रमाचे संचलन सुनील वानखेडे यांनी तर आभार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य चिंतले यांनी मानले

चौकट : जगात व देशात सर्वात कठीण काम शेती करणे आहे ही शेती फायद्याची, उत्पादनाची, सहकार्याची, माणुसकीची, प्रामाणिकतेची असते हे आज कार्यकर्त्वृतुन दिसुन येते हे आजच्या भाऊसाहेब माने राज्यस्तरीय गौरव पुरस्कारातुन दिसले

डॉ . एल . बी . कलंत्री
माजी संचालक
रेशीम संचालनालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!