Uncategorized

कृषि दूतांचे शेतक-यांना बीयाने उगवन क्षमते बद्दल मार्गदर्शन

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय, उमरखेड येथिल कृषि दूतांनी बियाणे उगवन क्षमता संदर्भात उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेतकरी शेतामध्ये बियाणे पेरतो आणि ५ ते ७ दिवसानंतर ते उगवलं की नाही हे तपासन्या करीता शेतात जातो. आणि काही वेळेस न उगवलेले बियाणे पाहून तो निराश होतो. त्यामुळे त्यांना पुन्हा पेरणी करावी लागते, त्यात त्यांचा वेळ तर जातोच व त्यांचा दुबार पेरणी करिता अतिरिक्त पैसा ही जातो. हे सगळं. टाळण्याकरीता बियाणे उगवन क्षमता तपासणी किती आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालय
उमरखेड येथील विद्यार्थी संकेत कदम, सौरभ राठोड, श्रेयस गोविंदवार, निशांत कर्वे, मनीकंटा पालथी, वैभव कदम व उत्कर्ष चव्हाण. यांनी गोनपाठ पद्धतीनुसार बियाणे उगवन क्षमता कसे पहायचे हे थोडक्यात समजावून सांगितले. सदर कार्यक्रम हा
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले व वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री.वाय.एस.वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्याचप्रमाणे ब्राह्मणगाव या गावातील सरपंच श्री. परमात्मा गरुडे उपसरपंच श्री. संदीप गोरे तसेच गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!