Uncategorized

शिवसेना उभातागट यांची लेखी तक्रार पोलीस अधिक्षक नगर परिषद निवडणुक लागण्यापुर्वी पोलीस अधिकारी यांचे स्थलांतर यावे

मुख्य संपादक मो.9021233696

लवकरच महाराष्ट्र राज्यात नगर परिषद निवडणुक जाहीर होणार आहे. त्यामध्ये उमरखेड नगर परिषदेची निवडणुक सुध्दा आहे. यापुर्वी शिवसेनेने आपणाकडे गोपनिय अहवाल सार्वजनिक केल्याबाबत नितीन भुतडा यांचे विरुद्ध तक्रार केलेली आहे. परंतु त्याची चौकशी त्या प्रकरणातील चौकशी अधिकारी शिंदे यांचेकडे पोलीस निरीक्षक उमरखेड यांनी दिल्यामूळे आम्ही त्यांचेकडे बयाण दिले नाही. ज्यांनी अहवाल सार्वजनिक केला त्यामध्ये पोलीस अधिकारी शिंदे यांची चौकशी होणे अनिवार्य आहे. परंतु त्यांनी आम्हास तोंडी बयाण देण्याकरीता बोलाविले बयाण देण्याबाबत लेखी सुचविले नाही. त्यामूळे आम्ही बयाण दिलेले नाही.

पोलीस स्टेशन उमरखेड येथे विविध पक्षाच्या लोकांना शांतता कमेटीचे मिटींगला बोलाविले जाते परंतु भारतीय जनता पक्षाचे समन्वयक नितीन भुतडा यांचा प्रभाव पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेवर आहे. शांतता कमेटीची सभा सर्व कमेटीचे सदस्य व सर्व पक्षाचे लोक आले तरी त्यांच्या येण्याशिवाय सुरू होत नाही. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील दोन्ही पोलीस अधिकारी नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे काम करु शकतात. लोकामध्ये संभ्रम निर्माण करु शकतात. उमरखेड शहरात ८ दिवसापुर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांनी सिनेस्टाईल एका शिक्षकास मारहाण केली. परंतु त्याची तक्रार भितीपोटी त्या शिक्षकाने केली नाही. परंतु सर्व समाज या घटनेने भयभित आहे. पोलीसांनी त्या घटनेची स्वतः दखल घ्यावयास पाहीजे होती. परंतु भाऊंचे कार्यकर्ते आहेत म्हणुन दखल घेतली नाही. उमरखेड येथील पोलीस अधिकारी हे एकाच व्यक्तीसाठी काम करतात असे सर्व जनतेला वाटते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जमीनीच्या खरेदीसाठी पोलीसांनी अधिकाराचा दुरुपयोग करुन त्या व्यक्तीस पोलीस गाडीत आणुन व्यवहार पुर्ण करुन दिला. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामूळे भारतीय जनता पक्षाच्या शिफारशीने आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या होणे गरजेचे आहे.

पोलीस स्टेशन उमरखेड येथे बैठक पार पाडतांना ज्याच्या विरुद्ध गंभीर तक्रार आहे त्यानाच पोलीस निरीक्षक प्रोटोकॉल मोडुन सोबत बसवितात त्यामूळे लोकांचय मनात भातीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांनी अन्याय केला तरी तक्रार देण्याची भिती निर्माण झाली आहे. पोलीस निरीक्षकांनी विडुळ येथील एका प्रतिष्ठित शेतकऱ्यास अधिकाराचा दुरुपयोग करुन पोलीस गाडीत बसुन आणुन भारतीय जनमा पार्टीच्या कार्यकर्त्यांचा व्यवहार पुर्ण करून दिला. त्यामुळे सामान्य नागरीक, व्यापार यांच्यामध्ये पोलीस अधिकारी यांचे विषयी भिती निर्माण झाली आहे. पोलीसांकडुन चुकीच्या लोकांना संरक्षण देणे व सर्वसामान्य जनतेस त्रास देण्याचा नियम झाला आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुक शांततेत, भयमुक्त व निष्पक्षपाती होण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकारी यांच्या बदल्या होणे गरजेचे आहे. उमरखेड शहरात दररोज लहान मुलांना गांज्या व चरस विक्री होत आहे. अनेकवेळा सांगुनही पोलीसांचे चरस, गांज्या, गुडखा विक्रीकडे लक्ष नाही. तरुण मुलांचे चरस, गांज्या व गुटखा विक्रीमूळे स्वास्थ्य बिघडत आहे. याशिवाय लहान मुले भरधाव वेगाने मोटरसायकल चालवितात. याकडे वाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे पोलीसांचे दुर्लक्षतेमुळे कॉलेज सारख्या ठिकाणी लहान मुले चाकु सारख्या हत्याराने मारामारी करीत आहेत. उमरखेड शहरातील नागरीकामध्ये पोलीसा विषयी सन्मान निर्माण होण्याच्या दृटीने कार्यकाळ संपलेल्या पोलीस अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!