उमरखेड नगर परिषद निवडणुक लागण्यापुर्वी सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे स्थलांतर करण्याची मागणी शिवसेनाची लेखी तक्रार .

मुख्य संपादक मो.9021233696
उमरखेड:- लवकरच महाराष्ट्र राज्यात नगर परिषद निवडणुक जाहीर होणार आहे. त्यामध्ये उमरखेड नगर परिषदेची निवडणुक सुध्दा आहे. यापुर्वी शिवसेनेने आपणाकडे मुख्याधिकारी उमरखेड यांनी विकास निधी हा नागरीकांचे वास्तव्य नसलेल्या परिसरात खर्च केला व नागरीकांच्या मागण्या असलेल्या परिसरात दुर्लक्ष केले याची तक्रार केली आहे. त्याबाबत अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. याशिवाय ज्यांचा कार्यकाळ अनेक वर्षापासुन संपलेला आहे असे कर्मचारी नगर परिषद उमरखेड येथे कार्यरत आहेत व ते भारतीय जनता पक्षाचे समन्वयक नितीन भुतडा यांचे प्रभावात आहेत, त्यांच्याकडे आज कुठलेही पद नसतांना ते दररोज नगर परिषदेमध्ये बसुन त्यांच्या मर्जीतील लोकांकरीता काम करतात व कर्मचारी त्यांनी सांगितलेले काम करुन इतर लोकांवर अन्याय करतात. त्यामूळे मुख्याधिकारी व कार्यकाळ संपलेल्या कर्मचारी /अधिकारी यांची बदली निवडणुक लागण्यापुर्वी होणे गरजेचे आहे.

याशिवाय पोलीस स्टेशन उमरखेड येथे विविध पक्षाच्या लोकांना शांतता कमेटीचे मिटींगला बोलाविले जाते परंतु भारतीय जनता पक्षाचे समन्वयक नितीन भुतडा यांचा प्रभाव पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेवर आहे. शांतता कमेटीची सभा सर्व कमेटीचे सदस्य व सर्व पक्षाचे लोक आले तरी त्यांच्या येण्याशिवाय सुरू होत नाही. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील दोन्ही पोलीस अधिकारी नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे काम करु शकतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करु शकतात. उमरखेड शहरात ८ दिवसापुर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांनी सिनेस्टाईल एका शिक्षकास मारहाण केली. परंतु त्याची तक्रार भितीपोटी त्या शिक्षकाने केली नाही. परंतु सर्व समाज या घटनेने भयभित आहे. पोलीसांनी त्या घटनेची स्वतः दखल घ्यावयास पाहीजे होती. परंतु भाऊंचे कार्यकर्ते आहेत म्हणुन दखल घेतली नाही. उमरखेड येथील पोलीस अधिकारी हे एकाच व्यक्तीसाठी काम करतात असे सर्व जनतेला वाटते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जमीनीच्या खरेदीसाठी पोलीसांनी अधिकाराचा दुरुपयोग करुन त्या व्यक्तीस पोलीस गाडीत आणुन व्यवहार पुर्ण करुन दिला. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामूळे भारतीय जनता पक्षाच्या शिफारशीने आलेल्या सर्व अधिकाऱ्याच्या बदल्या होणे गरजेचे आहे.
याशिवाय महसुल अधिकारी यांना आढावा बैठक घेतांना इतर पक्षाच्या प्रतिनिधीचा विसर पडतो. केवळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विसंभुन राहुन आढावा बैठक घेतांना इतर पक्षातील पदाधिकारी, शेतकरी व सुज्ञ नागरीकांना त्याची माहिती देण्याबाबत विसर पडतो. याशिवाय कृषि अधिकारी व पंचायत समितीतील अधिकारी सुद्धा एकाच व्यक्ती करीता काम करतात. सर्वसामान्य जनतेस त्यांचेकडे न्याय मिळत नाही. एकाच व्यक्तीभोवती सर्व प्रशासकीय अधिकारी फिरत आहे. त्यामूळे नगर परिषद निवडणुक निष्पक्षपाती होणार नाही. त्यामूळे सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे स्थलांतरण निवडणुकीपुर्वी होणे गरजेचे आहे.

उमरखेड येथे अवैध धंद्याचा सुळसुळाट असुन, दररोज छोटेमोटे अपघात घडतात. उमरखेड शहरात स्पेशल वाहतुक यंत्रणा आहे. परंतु ती यंत्रणा गावाबाहेर वसुलीची काम करतांना दिसते. त्यामूळे या सर्व प्रशासकीय अधिकारी व कार्यकाळ संपलेले कर्मचारी यांच्या बदल्या निवडणुकीपूर्वी करून निवडणुका ह्या निर्भय व निष्पक्षपाती पाडण्यास सहकार्य करावे अशी विनंती शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ता यांनी केली आहे.