महागाव तालुक्यात वडद, ब्रह्मी ,वागत, रस्त्याची दुर्दशा!

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात वडद ,ब्रह्मी ,वागत ,गावातील लोकांना रहदारीसाठी पावसाळ्यात चिखलातून शाळेतील मुलांना जाणे येणे कठीण झाले आहे.अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी यांनी या गावांना विकासापासून वंचित ठेवले आहे.निवडणुका लागल्याकी त्या गावांमध्ये जाऊन तुमच्या गावाचा विकास करू असे आश्वासनाची खैरात दिले जाते गावातील नागरिकांना आपल्या गावात स्वच्छ पाणी रोड नाल्या व जिल्हा परिषद शाळा सुंदर असावी अशा सुविधा सर्वसामान्यांना नागरिकांना आवश्यक आहे.या व्यतिरिक्त त्यांची अपेक्षा काही नसते अशा नागरिकांना भूल थापा देऊन जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा लोकप्रतिनिधी निवडून येतात आल्यावर दिलेले आश्वासनाला विसर पडते ही मोठी शोकांतिका आहे.गावातील लोकांचा मतापुरता उपयोग करून घेणे हे योग्य आहे का? जनता ही मालक आहे .प्रतिनिधी जनतेचा नोकर आहे.ही जान त्यांना नसावी ,हे स्वतःला मालक समजतात व तसेच जनतेत वावरतात . त्यामुळे गावातील नागरिकांना शासनाच्या योजने पासून ,विकासापासून वंचित राहावे लागते.मात्र आता मीडिया इंटरनेटचा जमाना आलेला आहे .सर्व गावातील सुशिक्षित विद्यार्थ्यां जवळ अँड्रॉइड चे मोबाईल असल्यामुळे फेसबुक व्हाट्सअप या माध्यमातून गावातील नागरिक जागृत झाले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात आश्वासनावर निवडून येणे कठीण झाले आहे .अशा परिस्थितीत वडद, ब्राह्मी , वागत ,या गावातील लोकांनी रस्ता व्हावा अशी सोशल मीडियाद्वारे मागणीला जोर धरला आहे.