त्या पुला संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विशेष दखल

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
नाल्यावरील पुलाच्या उंची संदर्भात चिंचोली (संगम) ता. उमरखेड येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची गरज व मागणी होती परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही स्तरावर दखल घेतल्या जात नव्हती. गावाच्या दुतर्फा कयाधू व पैनगंगा नदी वाहत असल्याकारणाने सततच्या उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागत होते. त्यातच चिंचोली नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याकारणाने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास गावाला चारही बाजूने पाण्याचा विळखा पडून रहदारीचे तसेच गावाबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होत होते. त्यात वित्त व जीवीत आणि यासारख्या घटना घडत होत्या. ही बाब रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आल्याने सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेत मागील काही वर्षापासून चिंचोली (संगम) नाल्यावरील ५० फूट उंचीच्या पुलास मंजुरी मिळण्यासाठी सा. बां. विभाग उमरखेड, सा. बां. विभाग पुसद व तसेच सा. बां. मंडळ यवतमाळ व सा. बां. प्रादेशिक विभाग अमरावती यांच्याकडे सातत्याने मागणीसह पाठपुरावा करण्यात आला होता. त्यातही संबंधित विभागाकडून वेळकाढूपणा करण्यात येत होता. ही बाब रिपब्लिकन युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या निदर्शनास आणून देत तसेच नवनियुक्त यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आजपर्यंत विविध स्तरावर करण्यात आलेला पाठपुरावा व सदर विषयीचे गांभीर्य निदर्शनास आणून देत काही दिवसापूर्वी सदर विषयी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. सदर मागणीची असलेली गरज लक्षात घेत जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांना चिंचोली (संगम) नाल्यावरील ५० फूट उंचीच्या पुलास मंजुरी देण्या संदर्भातील तातडीचे आदेश निर्गमित करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, ता.अध्यक्ष गौतम नवसागरे, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. उपाध्यक्ष राजू आगीरे, ता.कार्याध्यक्ष साहेबराव कदम ता. सचिव विनोद इंगोले तसेच चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.