रमाईच्या त्यागामुळेच बाबासाहेब घडले – डॉ अनिल काळबांडे उमरखेड :७ फेब्रुवारी हा दिवस इतिहासा मध्ये स्वर्ण अक्षराने

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
कोरलेला आहे. या दिवशी एखाद्या योद्याप्रमाणे आपल्या जीवनातील संकटाशी लढणाऱ्या , बाबासाहेबांना साथ देणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांचा जन्म झाला. या माऊलीने समाजाच्या हितासाठी जीवनभर खस्ता खाल्ल्या.तिचा त्याग.समर्पण, सहनशीलता, पती वर असणारा विश्वास यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णवेळ जीवनभर समाजकार्य करीत राहील बाबासाहेब दिवा तर रमाई त्या दिव्याच्या वात झाल्या . रमाईच्या त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर घडल्याचे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत डॉ अनिल काळबांडे यांनी केले .ते तालुक्यातील बेलखेड येथे आयोजित माता रमाई जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते .या कार्यक्रमाला अतिथी म्हणून मुख्याध्यापक सखाराम पाटील ‘ शिवराम वंचेवाड ,राजकुमार कोंडलवाडे , सुषमा पाटील ,बबन कदम मुख्याध्यापक बंडू तावडे पांडुरंग काळबांडे सह दोन्ही शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते .सुरुवातीला उपस्थितांना सामूहिक त्रिशरण पंचशील प्रदान करण्यात आले .त्यानंतर प्रतीक्षा पाईकराव व भाग्यश्री शिंगणकर यांनी रमाईच्या जीवनावरील गौरव गीते गाईली . डॉ काळबांडे यांनी , त्यागमूर्ती रमाईची गौरव गाथा सांगतांना , ऐवढ्या मोठ्या हिमालयाच्या उंचीच्या बाबासाहेबांना साधी भोळी रमाई त्यांची सावली झाली . या कार्यक्रमाला ज्ञानदीप शाळा व जिल्हापरिषद शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते . महेश काळबांडे , सुभाष शिंगणकर ‘ निलेश शिंगणकर रमाकांत शिंगणकर , अक्षय शिंगणकर ,सुभाष शिंगणकर ,तानाजी शिंगणकर नरेंद्र पाईकराव , भगवान शिंगणकर ,भागोजी शिंगणकर सुभाष शिंगणकर ‘ विवेकानंद , डी बी शिंगणकर सावतकर , वंदना सुभाष शिगणकर ‘ नंदा राऊत ,नंदा शिंगणकर ‘ गया शिंगणकर यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजन विजयानंद शिंगनकर यांनी केले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष शिंगणकर आभार नामदेव काळबांडे यांनी मानले . ( सोबत फोटो )