स्त्री भ्रूण हत्या” विषयावर सादरीकरण करून कु. अश्विनी आडे, कु. वैष्णवी जाधव यांनी पटकविला प्रथम क्रमांक.

उमरखेड प्रतिनिधी:- आत्तदिप धुळे
यवतमाळ येथे झालेल्या आविष्कार संशोधन अधिवेशनात यवतमाळ जिल्ह्यातून अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. साजातील काही महत्त्वपूर्ण समस्या व त्यावर उपाय शोधण्यासाठी समाजकार्यकर्त्याची भूमिका काय..
यावर प्रत्येक विद्यालयातील पदवीधर, पदवित्तर पदवी, पी. एच. डी. अशा वर्गवारीत विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विषयाबद्दल आपली भूमिका मांडली. त्यात गुलाम नबी आजाद,समाजकार्य विद्यालय पुसद येथील पद्वित्तर पदवी वर्गवारीत विद्यार्थिनी कु. अश्विनी आडे आणि कु. वैष्णवी जाधव यांनी “स्त्री भ्रूण हत्या” या
विषयावर भारतातील स्त्री भ्रूणहत्येेस प्रतिबंध करण्यात समाज कार्यकर्त्याची भूमिका काय हा विषय अतिशय उत्तम प्रकारे मांडून प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यामधे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मा. भालचंद्र देशमुख सर तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षकांच्या वतीने दोघींचेही अभिनंदन करून विभागीय स्तरीय निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.