Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मान्यताप्राप्त जागेवर स्थापित करा

सत्यशोधक शेतकरी संघाची निवेदनाव्दारे मुख्याधिकारी यांना मागणी

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

अख्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिकेने दोन वर्षापुर्वी योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणलेला असून आजपर्यंत पुतळयांची स्थापना झाली नाही ही बाब कोणत्याही शिवप्रेमी साठी निश्चितच दुःखदायी आहे त्यासाठी शिवप्रेमीना आमरण उपोषणास बसावे लागते हे आपल्या सर्वासाठी अतिशय दुर्देवी आहे .
महात्मा ज्योतीबा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून इतिहारूपी पोवाडा रचला
त्याच महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या आदर्शावर स्थापित सत्यशोधक शेतकरी संघामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन होण्यासाठी समाजातुन सामाजिक संघटनांनी प्रामाणिकपने एकत्र येऊन निस्वार्थ भावनेतुन काम करण्याची गरज असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजप्रती असलेल्या लोकभावनेचा. आदर करून महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना लवकराव लवकर शासन मान्यताप्राप्त जागेवर करण्याची कार्यवाही करून पुतळा स्थापित करण्याची मागणी ‘ निवेदनाव्दारे सत्यशोधक शेतकरी संघाचे डॉ. विजयराव माने, नितिन माहेश्वरी, देवानंद मोरे, डॉ. वि .ना . कदम, शिवाजी शं . माने, उद्धव गायकवाड, विनोद शिंन्दे, एस.एम. धोंगडे, अशोक वानखेडे, श्रीधर देवसरकर, उमाकांन्त मडके, किशोर तिवारी, देवराव कनकापुरे, बालाजी चंपती वानखेडे हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!