६० वर्षापासून घरकुलासाठी लाभार्थी उपेक्षित

भोई समाजातील बांधवाचा तीन पिढ्यांचा संघर्ष
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील चिंचोली (संगम) येथील भोई समाजातिल नागरिक हे ५० ते ६० वर्षापासून चिंचोली (संगम) ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्यास असुन, शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या घरकुल योजनेच्या सर्व निकषांमध्ये येत असुन, ३ ते ४पिढ्या उलटून सुद्धा शासनाच्या घरकुला संबंधी असलेल्या विविध योजनांपैकी कुठल्याही योजनेतून अद्याप भोई समाजातील एकाही लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळाला नाही.
लाभार्थी हे मागासवर्गीय घटकात येत असून त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने संबंधितांची घरे हि पाचट व कुडाची असून मोठ्या प्रमाणात मोडकळीस आली आहेत.
चिंचोली (संगम) हे गाव भौगोलिक दृष्ट्या पूरपरिस्थिती संदर्भात अति संवेदनशील आहे. कच्ची असलेली घरे क्षतीग्रस्त होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता असून सदर विषयाचे गांभीर्य जाणून रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात चिंचोली (संगम) येथील उपेक्षित लाभार्थ्यांनी सदर बाब ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून
वंचित लाभार्थ्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा अशी निवेदना मार्फत मागणी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. उपाध्यक्ष भीमराव खंदारे, शहर सदस्य कुणाल दवणे, ता. सरचिटणीस साहेबराव कदम, परसराम आगीरे, राजु आगीरे, प्रल्हाद आगीरे, बंडू आगीरे, दत्ता आगीरे, कैलास खडसे, साई पाटील नरवाडे, अमोल जाधव, दैनिक तालुका प्रतिनिधी अशोक गायकवाड, विजय कदम, राजेश खंदारे, दिलीप मुनेश्वर, विजय कदम तसेच मोठ्या संख्येने भोई समाजातील बांधव उपस्थित होते.