सामाजिक

कत्तलखाना परिसरातील अतिक्रमण हटवा

नागरिकांची मागणी; नगरपालिकेचे दुर्लक्ष

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड कत्तलखाना शहरातील परिसरातील नगरपालिकेच्या जागेवर स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच शासकीय जागा बळकाविण्याचा प्रयत्न करण्याच्या हालचाली शहरातील काही नागरिकाकडून केल्या जात आहे. परिणामी कत्तलखाना नागरिकांनी परिसरातील नगरपालिका प्रशासनाकडे येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी निवेदनातून
केली आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही नगरपालिका प्रशासन अतिक्रमणधारकांवर कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांनी सदरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार उमरखेड यांच्याकडे निवेदन देऊन सदरील जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याची
मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, आ. ससाने, साहाय्यक संचालक नगररचना विभाग यवतमाळ यांच्यासह वरिष्ठ पातळीवर देण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून सदर अतिक्रमण काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!