सरोजताई देशमुख यांच्या आगमनाने हिंगोली लोकसभा निवडणुक चौरंगी लढत होण्याची शक्यता

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची वर्णी लागली. तर महाआघाडीचे उमेदवार म्हणून नागेश आष्टीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर वंचितकडून डॉ. बि.डी.चव्हाण, मनोजदादा जरांगे यांचे समर्थक म्हणून सरोजताई देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेमंत पाटील , नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी. डी. चव्हाण , मराठा समाज सेवक म्हणून मनोजदादा समर्थक म्हणून सरोजताई देशमुख हे प्रमुख दावेदार ठरत आहेत.
हिंगोली लोकसभेत विदर्भातील उमरखेड, महागाव हे दोन तालुके आहेत. तर मराठवाड्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर या तालुक्यांचा समावेश होतो.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठे योगदान राहिले आहे. मात्र सध्या सेनेचे दोन गट पडले असल्याने महायुतीमध्ये शिंदे
गटाचे हेमंत पाटील तर महाआघाडीमध्ये उबाठा गटाचे नागेश आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचितकडून डॉ. चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तर मनोज जरांगे यांचे समर्थक म्हणून सरोज देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते. एकंदरीत पहाता हिंगोली लोकसभेत चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.