सात जनावरांचा होरपळून मृत्यू

जेवलीत सहा घरांना आग; शेतीचे साहित्य, धान्य आदी वस्तू जळून खाक
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड, ता. १४ : तालुक्यात बंदीभागातील जेवली येथील सहा घरांना आज बुधवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. या आगीत घराजवळील गोठ्यात बांधून असलेल्या सात जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत शेतीचे साहित्य, घरातील धान्य, कपडे पूर्ण जळून खाक झालेत. घरात कोणतीही व्यक्ती नसल्याने सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. परंतु, या आगीमुळे सहा घरांमधील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले.
तालुक्यातील बिटरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बंदीभागातील जेवली या गावातील शेतकरी सिन्हा मारुती धोत्रे व शेतमजूर दत्ता सोनुले, सिन्हा फकिरा काळे, दत्ता धोत्रे, संतोष धोत्रे, लक्ष्मण धोत्रे या सहा जणांच्या घरांना आज बुधवारी दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. या आगीमध्ये घराजवळील गोठ्यात बांधून असलेले सिन्हा धोत्रे यांचे सहा गायींचे वासरू तथा तीन बोकड, तर दत्ता धोत्रे यांचे
दोन बोकड व लक्ष्मण धोत्रे यांचे दोन बोकड, दत्ता सोनुले यांच्या तीन कोंबड्या आगीत होरपळून मृत्यमुखी पडल्या. घरातील सर्व सदस्य शेतीत काम करण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. दरम्यान, आग लागल्याचे समजतात गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. उमरखेडवरून अग्निशमन दलाचे वाहन गेल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले
जेवली येथील घरांना लागलेली आग, दुसऱ्या छायाचित्रात आगीनंतर घराचे व गोठ्याचे उरलेले अवशेष.
परंतु, तोपर्यंत सहा कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालेला होता. या भीषण आगीत सिन्हा धोत्रे यांच्या घरातील शेतीचे साहित्य, स्प्रिंकलरचा शेट, पीयूसी पाइप जळून खाक झालेत. घटनेची माहिती मिळताच बिटरगाव पोलिस ठाण्याचे बोट जमादार व
गायींचा हंबरडा मन हेलावणारा!
- आगीत सर्व काही खाक झाले. अंगावरील कपड्याशिवाय काहीही शिल्लक राहिले नाही. धान्य साहित्य जळून गेले असून, त्याचे काही वाटत नाही. परंतु, गाईचे वासरू आणि बोकड मेले, त्याचे दुःख वाटतंय. आताच सायंकाळी गायी घराकडे आल्यावर हंबरडा फोडतील, या कल्पनेने जीव कासावीस होत आहे, कारण गायीचा हंबरडा हा मन हेलावणारा असेल, अशी भावना जेवली येथील आगग्रस्त शेतकरी सिन्हा मारुती धोत्रे यांनी ‘सकाळ’ जवळ व्यक्त केली.
शिपाई यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. या आगीत शेतकरी व शेतमजूर यांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. म्हणून या नुकसनाचा तातडीने पंचनामा करून शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी केली जात आहे.