Uncategorized
सौ. राजश्रीताई पाटील यांची पोफाळी येथील अंध, मूक- बधिर शाळेला सदिच्छा भेट –

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालय व रेणुकाबाई जाधव अंध विद्यालय पोफाळी येथे सौ. राजश्रीताई पाटील यांनी दिनांक 28/01/2024 ला सदिच्छा भेट दिली असता आयोजीत कार्यक्रमात प्रास्ताविका मध्ये मुख्याध्यापक श्री एन. बी. राठोड सर यांनी संस्थेच्या स्थापने पासून दोन्ही शाळांच्या शैक्षणिक, सांस्कृतीक व क्रिडात्मक विकासाबाबत पाहुण्यांना माहिती दिली. दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गितगायन, वाघ वादन करून तसेच विविध गुण प्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे मनोरंजन केले. प्रामुख्याने सौ. पाटील मॅडम यांनी विद्यार्थी व प्रशिक्षक शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. सौ. राजश्रीताई पाटील यांनी आपले मनोगतामध्ये वसंत सहकारी साखर कारखाना व स्व. वसंतराव नाईक अंध, मूक-बधिर व अपंग शिक्षण संस्था पोफाळी यांचे मध्ये असणा-या पूर्वीपासुनच्या संबंधावर प्रकाश टाकला व हे मधुर संबंध यापुढेही कायम राहून वृद्धींगत होतील अशी ग्वाही दिली. सौ. पाटीलताई यांनी आपल्या शाळा भेटीमध्ये संपूर्ण शाळा परिसर मुलां-मुलींच्या निवासाची सोय, जेवनाची व्यवस्था, परिसरातील स्वच्छता व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहुन कौतुक करून समाधान व्यक्त केले.
मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी शाळेच्या काही अडचणीबाबत चर्चा केली असता सौ. पाटीलताई यांनी खासदार मा. श्री हेमंत पाटील साहेब यांचे कडे आपल्या मागण्याबाबत चर्चा करून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खात्रीशीर प्रयत्न करेल असा विश्वास दिला. तसेच आपल्या उमरखेड व पोफाळी येथील गोदावरी अर्बन बँकेच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही शाळांना जमेल तेवढी मदत करण्याचे आश्वासन श्री क्षिरसागर साहेब शाखा व्यवस्थापक यांचे उपस्थितीत दिले.
आपले मनोगतामध्ये बोलतांना सौ. पाटीलताई यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांचे कर्तव्याबाबत सुद्धा जाणीव करून दिली. शिक्षक हा किती श्रीमंत असतो याचे मार्मीक उदाहरण देऊन शिक्षकांचा गौरव केला. शासकीय अनुदानावर चालणा-या अनेक शाळा पाहिल्या परंतु ही शाळा मला सर्वोत्तम वाटली तसेच खाजगी शाळेपेक्षा कितीतरी पटीने सर्वच बाबतीत चांगली वाटली असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाबाबत सौ. पाटीलताई यांनी गौरवोद्गार काढून आभार मानले.
उपस्थित सर्व विद्यार्थ्याना मायेच्या ममतेने मार्गदर्शन करून जिवणात कधीही खचून न जाता प्रयत्नशिल रहावे. ईश्वर ज्यावेळी एखादी गोष्ट कमी देतो त्यावेळी ईश्वर आपणांस अनेक गोष्टी जास्तीच्या देतो. त्यामुळे ईश्वरावर विश्वास ठेवून गुरूजनांचा आदर करून शिक्षण ग्रहण करावे असा कानमंत्र दिला..
एकुणच सौ. पाटीलताई यांनी समाधान व्यक्त केले.