महाराष्ट्र
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : कारागीरांना सहाय्य करण्यासाठी मोदी सरकारची महत्त्वपूर्ण योजना!

(ग्रामीण )प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,
मो.7875525877
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपारिक कारागिरांना सहाय्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्थसंकल्पात १३,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये १८ प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे..
यामध्ये सुतार, बोट निर्माते, शस्त्रे निर्माते, लोहार, कुलूप बनविणारे, हातोडा आणि टूलकिट निर्माते, सोनार, कुंभार, मूर्तीकार, मोची, मिस्त्री, टोपल्या, चटई , झुंबरे बनवणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, धोबी, शिंपी, माश्यांचे जाळे विणणारे यांचा समावेश असणार आहे.
५% इतक्या अत्यंत कमी व्याजदरासह सुलभतेने मिळणाऱ्या कर्जामुळे ही योजना लाभदायी ठरेल. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती..