Uncategorized

शिवसेनेची मागणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर उमरखेड नगर परिषद अंतर्गत असलेले संपुर्ण अतिक्रमण त्वरीत काढणे यावे तसेच शहरातील महामार्गाचे काम तात्काळ करणे यावे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ हा गेला आहे. सदरचा मार्ग उमरखेड शहरात पंचायत समिती कार्यालयासमोरुन श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नांदेड रोडकडे पेट्रोल पंपापर्यत उमरखेड शहरातुन गेलेला आहे.त्या महामार्गावरील काही प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आलेले आहे. अतिक्रमणकाढत असतांना भेदभाव झालेला आहे. काही लोकांचे अतिक्रमण काढले आहेत, तर काही लोकांचे अतिक्रमण काढलेले नाही.

उमरखेड शहरात आगमन झाल्याबरोबर नंदी हंटिलपासुन ते शेवटी पटेल पेट्रोल पंपापर्यंत अत्यंत रहदारी व वरदळीचा रस्ता आहे. हा मुख्य रस्ता असुन, याच रस्त्यावर शासकीय कार्यालये आहेत. शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी येणे जाणे करतात, या रस्त्यावर उमरखेड शहरातील महत्वाचे दवाखाने सुध्दा आहेत.

रस्त्यावरील पुर्ण अतिक्रमण निघाले नसल्यामूळे आजही वाहन चालविण्यास व रस्त्याच्या बाजुने पैदल जाण्यास अडथळा निर्माण होवुन दररोज अपघात होत आहेत. आपल्याकडुन काढण्यात आलेले अतिक्रमण अपुरे असुन, पुर्णतः काढण्यात आलेले नाही. खालील अतिक्रमणे आजही कायम आहेत.
१) उमरखेड शहरात यवतमाळकडुन आल्याबरोबर रस्त्याच्या डाव्या बाजुला राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हस रोडवर काही लोकांनी व्यापारी संकुल बांधुन अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.

२) उमरखेड नगर परिषदेने गावातील अतिक्रमण काढतांना स्वतः राजे संभाजी महाराज उद्यानाच्या समोरच्या बाजुने अनेक टिनपत्राची दुकान उभारुन भाड्याने दिली आहेत, ते स्वतःचे अतिक्रमण मात्र नगर परिषदेने काढलेले नाही. सदर अतिक्रमण सुध्दा आपल्या राष्ट्रीय महामार्गावर आहे.

3) छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंपाजवळील अतिक्रमण आहे. तसेच वनविभागाचे कार्यालयाजवळील अतिक्रमण काढतांना भेदभाव झाला आहे. त्या ठिकाणचे पुर्ण अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.

४) नागचौक ते पटेल पेट्राल पंपापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्रमण आहे ते सुध्दा काढणे जरुरीचे आहे.

आपल्या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात घडत आहेत व अनेकवेळा जिवीतहाणी झाली आहे. नगर परिषद उमरखेड यांनी नालीवर अतिक्रमण करुन व्यापारी संकुल बांधले आहे. त्यामूळे दररोज नालीचा उपसा होत नाही. त्यामूळे अचानक पाऊस येवुन अधिकृत दुकानामध्ये पावसाचे पाणी शिरुन नुकसान होत आहे.

नगर परिषदेने अनाधिकृत बांधकाम करुन जाहीर लिलावाद्वारे दुकाने भाड्याने दिली आहे. त्यामध्ये आता मुळ भाडेकरु न राहता दुसरेच भाडेकरु राहत आहेत. खाजगी अतिक्रमण काढत असतांना नगर परिषद उमरखेड यांनी केलेले अतिक्रमण सुध्दा काढणे गरजेचे आहे. राजे संभाजी महाराज उद्यानासमोर नगर परिषदेने केलेल्या अतिक्रमणामुळे त्या ठिकाणावरुन नागरीकांना जाणेयेणे करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वरील सर्व अतिक्रमण लवकरात लवकर काढुन राष्ट्रीय महामार्गावरील अडचणी व अडथळे दुरे करावेत. सदर कारवाई पावसाळा सुरु होण्यापुर्वी करावी, अन्यथा आम्हास आमचे मागणीकरीता इतर अधिकृत मार्गाचा अवलंब करावा लागेल.
परिसराकडे दुर्लक्ष केले आहे. अशा आशयाचे निवेदन शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष अॅड. संजीव कुमार जाधव, ज्योती ,बसवेश्वर शिरसागर ,सुरोशे, शिवकन्या सुरोशे, वंदना चव्हाण, लक्ष्मी मैड, सुनील शहाणे, राजू गायकवाड आदींनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!