Uncategorized

राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी त्वरित उपयोजना करा :

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


महागाव :-नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात लक्षणीय असून कलगाव ते मुडाणा दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. हे होणारे अपघात रोखण्यासाठी त्वरित उपयोजना करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे. मुडाणा, कलगांव व तसेच आंबोडा मार्गे महागांव शहरात येताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करून शहरात यावे लागत आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी वाहनधारकांना कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने हे अपघात घडत असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे. महागांव बायपासच्या राष्ट्रीय महामार्गावर वळणावर बारीक चुरी, गिट्टी, रेती पडून असल्याने तेथे भीषण अपघात घडत आहे. तेथे दुभाजक अंतरही नाही, दिशादर्शक फलक नाही, वाहतूक सिग्नल नाही, कोणत्याही सुविधा नसल्याने तेथे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनधारकांचा प्रवास सुखकर होईल व अपघातही घटेल अशी प्रतिक्रिया प्रतीक पाटील नरवाडे यांनी मांडली असून राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी महागांव शहरात येणाऱ्या रस्त्यावर त्वरित उपयोजना करून न दिल्यास जनहितासाठी आंदोलन छेडण्यात येईल इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!