Uncategorized

पुरुषोत्तम अँड कंपनी भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे लिज मुदतवाढ वाढवुन न देणे येऊ नाही अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख, बसवेश्वर क्षीरसागर, यांनी केली आहे.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : शहराततील छत्रपती शिवाजी
महाराज चौकात चालक सारडा यांच्या पेट्रोल पंपची लिज संपुष्टात आल्याने ती वाढवून देऊ नये. तसेच
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी शिवसेना उपशहरप्रमुख, बसवेश्वर क्षीरसागर, यांनी २० जून केली आहे. ज्यावेळेस हा पेट्रोल पंप शहरांमध्ये सुरू झाला त्यावेळेस शहराची लोकसंख्या जेमतेम ५००० इतकी होती. आज रोजी उमरखेड शहराची लोकसंख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहे. शहरामध्ये विविध सण, उत्सव, मिरवणूक राजकीय पक्षाची आंदोलने या चौकात होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा पेट्रोल पंप अतिशय धोकादायक असून पेट्रोल पंपाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू असून ते प्रगतीपथावर आहे नगरपरिषदेची भव्य दिव्य इमारत त्याच पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आहे त्यामध्ये उमरखेड शहरातील नागरिकांची महत्त्वपूर्ण दस्तावेज असून एखादी दुर्घटना घडल्यास जीवित्व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

उमरखेड येथील छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराज पुतळ्यालगत उमरखेड येथे शासकीय जागेवर कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पुरुषोत्तम अँड कंपनी या पेट्रोल पंपाच्या संदर्भात आम्ही आक्षेप नोंदवित आहे.असल्याने खालीलप्रमाणे अडचणी व धोके निर्माण झाले आहेतः
सदर पेट्रोल पंपाची लीज मुदत समाप्त झालेली असून, ही जागा वर्दळीच्या भागात
वाहतूक कोंडी : शहराच्या मध्यभागी असल्याने तसेच या ठिकाणी हनुमान मंदीर असल्यामुळे दर्शनाकरीता भाविक मोठ्या संख्येने येत असतात तसेच पेट्रोले पंपाचे समोरच्या बाजुस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे व उत्तर बाजुस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. यामुळे सदर पंपावर होणारी वाहनांची गर्दी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे व यापुर्वी या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत.सुरक्षा धोका : ज्वलनशील पदार्थ असलेल्या ठिकाणी मोठी लोकवर्दळ आणि वाहनांची वर्दळ ही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण करते. पेट्रोल हे ज्वलनशील पदार्थ
असल्यामूळे या विकाणी मोठा अपघात होवुन हजारो नागरीकांचे जिव धोक्यात येवु शकतात.
पर्यावरण व ध्वनीप्रदूषणपंपाजवळील येणाऱ्या वाळनाच्या सततच्या ध्वनी आणि पुरामुळे या ठिकाणी हनुमान मंदीराज दर्शनाकरीता येणाऱ्या तसेच या ठिकाणी नगर परिषेचे मोठे व्यापारी सकुल असल्यामूळ खरेदी करीता येणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागतो.
सार्वजनिक हितास बाधा सदर शासकीय जागा शहराच्या छादयस्थानी असून, ती इतर सार्वजनिक सुविधा जसे की वाहतूक नियमन केंद्र, पार्किंग आदीसाठी उपयोगात आणता येऊ शकते. तसेच या पेट्रोल पंपामुळे या ठिकाणावरुन जाणाऱ्या राज्यमार्ग क्रं. ,२६२ ची रुंदी अतिशय कमी करण्यात आली असुन, पंपाचे बाजुने नालीचे काम करण्यात आलेले नाही, त्यामूळे सदर ठिकाणाचे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होवुन सदर पावसाचे पाणी रस्त्यावर साचुन राहुन अपघात होवु शकतात.
सदरील पेट्रोल पंप लगत नहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यामुळे सदर पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा वाद उद्‌भवल्यास त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास बाधा पोहोचू शकते व असे झाल्यास जातीय तेढ निर्माण होवुन दंगलीच्या घटना घडू शकतात त्यामुळे शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच सदर पेट्रोल पंप चालकाने छपपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे बाजुने शौचालय व मुत्रीघर उभारलेले असुन, त्याचे घाण पाण्याचे आऊटलेट पुतळ्याचे बाजुने आहे, त्यामूळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याची विटंबना होवु शकते. तेव्हा सदरील पेट्रोल पंपाचे लिजची मुदत वाढवुन देणे लोकहिताचे होणार नाही.

त्यामुळे आपणा सेवेशी विनंती आहे की सदर पेट्रोल पंपाची लीज पुढे न वाढवता, तो तात्काळ हटवण्यात यावा आणि सदर शासकीय जागेचा उपयोग लोकहितासाठी करण्यात. अशी मागणी
बसवेश्वर क्षीरसागर, शिवसेना उपशहरप्रमुख, यांनी निवेदनाचे माध्यमातून तहसीलदार उमरखेड यांना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!