जि.प. मुलांची शाळा चातारी भाऊसाहेब माने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित”

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :सहकार महर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी विज्ञान मंच, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय व भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार परसबाग भाजीपाला सामूहिक व्यवस्थापन विशेष कार्यासाठी जिल्हा परिषद मुलांची शाळा चातारी तालुका उमरखेड यांना देण्यात आला. शालेय पोषण आहार सकस आणि रुचकर दिल्या जावा यासाठी शाळेच्या प्रांगणातील परसबागेत मेथी, पालक, दोडका, गाजर, बीट, शेपू, कोबी, लवकी, आवरा, पेरू,लिंबू, कोथिंबीर, टमाटे,भेंडी,मुळा, लसूण, कांदा,वांगी इत्यादी सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळभाज्या कोणतेही कीटकनाशक न वापरता सेंद्रिय पद्धतीने घेऊन हा भाजीपाला शाळेच्या पोषण आहार योजनेत नियमित वापरला जातो . महाराष्ट्रात हा उपक्रम नाविन्यपूर्ण, कौतुकास्पद व अनुकरणीय आहे. सकस आहारा सोबत विद्यार्थ्यांना भाजीपाला उत्पादनाचे प्राथमिक शिक्षण मिळत असल्याने त्यांच्या शेतीविषयी ज्ञानात भर पडत आहे. या उपक्रमासाठी शाळेचे शालेय पोषण आहार स्वयंपाकी श्री भिमराव कुंभलवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव नरवाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव माने, मुख्याध्यापिका कल्पना आघाव,शिक्षक ज्ञानेश्वर भडंगे, शिक्षिका कांचन चंद्रवंशी व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच विध्यार्थी यांचा सिंहाचा वाटा आहे. अशाच प्रकारचे उपक्रम प्रत्येक शाळेने राबविले तर सकस आहारासोबत विद्यार्थ्यांना शेतीविषयक तंत्राचे सखोल ज्ञान मिळेल. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंद मुकेवार (ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ), उद्घाटक . डॉ. शरद निंबाळकर (माजी कुलगुरू डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला), प्रमोद लहाळे(विभागीय कृषी सहसंचालक अमरावती), संतोष डांबरे, कृषी विद्यालयाचे चेअरमन डॉ . विजय माने,अँड अर्चनाताई माने, माजी आमदार विजय खडसे, नितीन माहेश्वरी, प्रशांत नाईक, कल्याणराव माने, अशोकराव वानखेडे,यांच्या हस्ते देण्यात आला .