Uncategorized

सत्संगाच्या माध्यमातून आत्म्याचे शुद्धीकरण व अध्यात्मिक पवित्र ज्ञान

ग्रामीण प्रतिनिधी विलास. टि. राठोड (ग्रामीण )
मो. 8459804698

नांदेड,महाराष्ट्र दि, 05/01/2025 रोजी वार रविवार पूर्णा रोड छत्रपती चौक यशोरुणा मंगल कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग हा अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सत्संगांमध्ये संत रामपाल जी महाराज मानवजातीला शाश्वत शांती, मोक्ष, आणि खऱ्या धर्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. त्यांच्या प्रवचनांद्वारे श्रोते वेद, गीता, कुराण, बायबल आणि गुरु ग्रंथ साहिबातील सखोल ज्ञान आत्मसात करतात.

सत्संग आयोजनात संत रामपाल जी महाराज समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, व्यसन आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी जनजागृती करतात. त्यांच्या प्रवचनांमध्ये भक्ति मार्गाचा खरा अर्थ, ईश्वरप्राप्तीचा सुलभ मार्ग आणि साधनेचा महत्त्वाचा विषय स्पष्टपणे मांडला जातो.

सत्संगात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसते, आणि सर्वांसाठी प्रवेश खुला असतो. येथे (चाय बिस्केटे ) पाणी व पार्किंग सुविधा उपलब्ध असते. या कार्यक्रमांमध्ये , प्रवचन, आणि आत्मा शुद्धीकरणाचे तत्त्वज्ञान शिकवले जाते.

सत्संगाच्या माध्यमातून संत रामपाल जी महाराज हजारो लोकांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात. त्यांच्या शिक्षणामुळे सामाजिक सुधारणा होत आहे आणि अनेक लोक आध्यात्मिक आनंद व समाधान अनुभवत आहेत. सत्संग ही मानवतेच्या उत्थानाची दिशा दाखवणारी प्रकाशमान ज्योत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!