Uncategorized

शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी पीकविमा रक्कम द्या…संध्या रणवीर

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


दि 14 महागांव/काळी दौ पेरणीपुर्वी शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम देण्यात यावी अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे पाठविले आहे.


मागील वर्षी महागांव तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी च्या प्रकोपात सापडला त्याचे उभे पीक नेस्तनाबूत झाले. शेतकरी त्यात पुरता उध्वस्त झाला. त्याने पीक विमा काढून त्या अतिवृष्टीतील पिकाचा पंचनामा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला. मात्र अद्याप पावेतो पीक विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. नवीन खरीप हंगामाच्या

पेरणीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्याला विम्याची रक्कम द्यावी व त्यास त्यातून पीक पेरणी व लाग लागवडीसाठी ती कामी येईल व शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळेल ही अपेक्षा व्यक्त करत संध्या रणवीर यांनी निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!