Uncategorized

कर्जमाफी समिती तयार करणार, CM फडणवींसाची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा


प्रतिनिधी संजय नागरगोजे
Bacchu Kadu Hunger Strike : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केला आहे. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन लावला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरुन बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला.

बच्चू कडू यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तातडीने समिती तयार केली जाईल आणि त्या समितीमध्ये बच्चू कडू यांचा समावेश करण्यात येणार तसेच या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवर बोलताना म्हटल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांनी केल्या आहेत त्यासाठी आम्ही एक बैठक घेऊ आणि या बैठकीला बच्चू कडू यांच्यासह सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील. तसेच दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आनावं लागतं, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच यामध्ये किती वाढ करण्यात यावी हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील असं देखील बावनकुळे म्हणाले.

कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन डेटा जमा केला जाईल व त्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात येईल. असं देखील बावनकुळे म्हणाले. याच बरोबर कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील राज्याचे मंत्री बावनकुळे शेतकऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!