Uncategorized

मनसेच्या वतीने हिंदू जननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त कुटुंब,

अल्पभूधारक व गरजवंत 1100 शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटप…
मनसे पोहचली शेतकऱ्यांच्या बांधावर… सलग पंधरा वर्षापासून उपक्रम सुरू..

जिल्ह्यात विविध उपक्रम… पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार, वृक्षारोपण, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत, उपेक्षित प्रभुजींना भोजन…

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

हिंदू जननायक माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शासनाच्या सुलतानी संकटाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे सरसावली असून खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने जिल्ह्यातील अल्पभूधारक आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना व खऱ्या अर्थाने गरजवंतांना मनसेने मदतीचा हात देत प्रति तीन एकरी शेताला तीन पाकीट कापूस बियाणे, व दोन पाकीट तुर बियाणे याप्रमाणे शेतकऱ्यांना बियाणांच्या पहिल्या टप्प्याचे वाटप आज मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये 300 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून संपूर्ण हंगामात 1100 च्या जवळपास शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा नेते अनिल हमदापूरे यांनी याप्रसंगी दिली.
शासन दरवर्षी शेतकऱ्यांसाठी विविध योजनाजाहीर करत असते. परंतु वास्तविकतेत शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानच पुसली जातात सरकारच्या बहुतांश योजना या कागदावरच असतात नाहीतर लोकप्रतिनिधींच्या निकटवर्ती यांना त्याचा लाभ मिळत असतो अशा शब्दात मनसेचे अनिल हमदापूरे यांनी शासनाच्या उदासीन धोरणावर याप्रसंगी टीका करीत मनसे सदैव शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असून मनसेची सत्ता नसतानाही मनसे सदैव सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे असे मत मांडले. खरीप हंगामात आपली जमीन पडीत राहते की काय अशा विवंचनेत शेतकरी असताना मनसेने दिलेला मदतीचा हात म्हणजे गरजवंत शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. वास्तविक माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारची भंपकपणा न करता, खऱ्या अर्थाने गरजवंतांना मदत करण्याचे धोरण मनसे राबवीत असून सर्व शेतकऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मनसे च्या या उपक्रमाचे कौतुक करत माननीय राज साहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो असे आशीर्वाद या प्रसंगी दिले. शेतकऱ्यांच्या बांधावर शासन तर पोचलेच नाही परंतु त्यांच्या मदतीला मनसे मात्र न चुकता दरवर्षी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना बियाण्यांच वाटप करते.मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार व अनिल हमदापुरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा उपक्रम सलग पंधरा वर्षापासून राबविण्यात येत आहे. आज या उपक्रमांतर्गतच यवतमाळ तालुक्यातील इचोरी, तिवसा, वडगाव पोलीस स्टेशन, सावरगाव भाग, चिचघाट, वाई हातोला, यवतमाळ ग्रामीण या परिसरातील गरजू 300 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याचे वाटप मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे,यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने लकी छांगाणी, सोनु गुप्ता, तुषाल चोंडके, शिवम नांदुरकर, सौरभ अनसिंगकर, सुदर्शन शिंदे पाटील,आशिष सरूळकर, गोपाल घोडमारे, नीरज देशपांडे यासह लाभार्थी शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!