संध्या रणवीर यांचे राष्ट्रवादी काँगेस कडून नाव चर्चेतमहागांव/उमरखेड दी १४ सप्टे

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
विधानसभा निवडणूक २०२४ साठी सर्व पक्षाची मोर्चे बांधणी सुरु असून महाविकास आघाडी व महायुती मध्ये लढाई पक्षफोडी ला आव्हान म्हणून चुरशीची होणार आहे हे निश्चित असून उमरखेड विधानसभेसाठी २०१९ ला महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती त्यामुळे नेमकी उमरखेड ही घटक पक्षाच्या कोणत्या पक्षाला दोन्ही कडून सुटेल याची खात्री नसल्याने सर्वच पक्ष या अनुसूचित जाती राखीव असलेल्या मतदार संघात कामाला लागले आहेत.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासाठी आग्रही असून जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांच्याकडे सौं संध्या संदेश रणवीर यांनी उमरखेड विधानसभेत इच्छुक म्हणून अर्ज सादर केला आहे.उमरखेड साठी एकूण ७ अर्ज आले असून त्यात संध्या रणवीर या एकमेव महिलेचा अर्ज असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.
आता केवळ ही जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले असून यापूर्वी या मतदार संघात महिलेला प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने तशी परिस्थिती आल्यास संध्या रणवीर यांचा उमेदवारी साठी विचार होण्याची शक्यता महिला उमेदवार म्हणून बळावली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षांकडे ही जागा होती त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती त्यामुळे यावेळच गणित काय होईल हे सांगणे कठीण असल्याने त्यामुळे महाविकास आघाडी च्या मधील कोणत्या पक्षाला उमेदवारी सुटेल हे निश्चित नसल्याने सारेच कामाला लागले आहेत.
संध्या रणवीर यांनी मागील ७-८ वर्षांपासून सामाजिक काम करण्यात त्या अग्रेसर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असताना पक्षांने त्यांची कामाची पद्धत पाहून राष्ट्रवादी युवती काँग्रेस महागांव तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली पदाला साजेसं काम त्यांनी पदावर असताना पक्ष कार्य केल्याची कित्येक उदाहरणं आहेत महिला सक्षमीकरण,कृषी, शेतकरी, आरोग्य, अतिवृष्टी मदत, स्पर्धा परीक्षा आयोजन, दादासाहेब गायकवाड सबलिकरण योजना अपुरा निधी बाबत आंदोलन पेट्रोल पंपावरील मार्केटिंग डिसिप्लिन नुसार मिळत नसलेली सुविधा, मानव विकास मिशन च्या विधार्थिनी साठी परिवहनची बस कोरोना नंतर चालू करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली, स्पर्धा परीक्षा साठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांना बस मोफत करण्याची मागणी केली, युवती व महिलांना आरोग्य शिबिराचे आयोजन केले, प्राथमिक आरोग्य केंद्रान्ना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केल्या त्याबाबत संचालक पुणे कडे प्रस्ताव प्रलंबित आहे. वीज वितरण चा लपंडाव थांबवण्यासाघी मुख्यमंत्री यांना याबाबत निवेदने दिली. जाणसामान्यांना मुद्रांकाचे अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने त्यांना जरब बसावी म्हणून निवेदन याबाबत सर्व दुय्यम निबंधकाना सूचना दिल्या व नोटीस स्टॅम्प व्हेंडर ला पत्रे मिळाली, महिला जिम ची व्यवस्था करण्याबाबत महिला बाल विकास मंत्र्यांना निवेदनातून मागणी. गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप केले. शहरी भागाप्रमाणे घरकुल निधी वाढावा ही भूमिका ठेवली व ग्रामविकास मंत्र्याकडे पाठपुरावा सुरु आहे. कोरोना नंतर होत नसलेल्या ग्रामसभा व त्यामुळे रखडलेला ग्रामविकास या साठी ग्रामसभा सुरु करण्याबाबत शाश नाचे लक्ष वेढले, विधवा निराधार यांच्या पगार सुरु करून देण्यात योगदान व यांना सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे दिवाळी बोनस मिळावे ही मागणी केलीवेळप्रसंगी तहसीलदार यांना त्यांचे दुःख दाखवायला जागेवर नेले, शेतीचे पांदनं रस्ते ह्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्याने मातोश्री पांदनं रस्त्यांना मंजुरी मिळाली. गाव जोड रस्ते निर्मिती करिता शासनाकडून मंजुरी मिळवली. माहूर पोहरादेवी हा धार्मिक स्थळाला जोडणारा रस्ता निर्माण व्हावा यासाठी पाठपुराव्याला यश आले. सिंचन विहीर अंतराची ५०० फूट अट रद्द करण्यात शासनाचे लक्ष केंद्रित केले व अट रद्द झाली.अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून ५०००० देण्याची मागणी केली, पीक कर्ज वाटप यासाठी तक्रार केली असता ४ दिवसात ४ कोटीचे कर्ज सोसायटी ना वाटण्यास भाग पाडले, नियमित कर्जदार यांना प्रोत्साहन अनुदान मिळावे या साठी प्रयत्न केले. शेतकरी आत्महत्या यासाठी अंन्नत्याग आंदोलनात सहभाग अन्नदात्या प्रति कृतज्ञता. प्रवासी हितार्थ बस सुरु करण्यासाठी प्रयत्न व यश आले. जलजीवन मिशन च्या अनागोंदी कारभारा बाबत तक्रार केली असता या बाबत ठेकेदार यांना सूचना मिळाल्या स्पर्धा परीक्षेच्या विध्यार्थ्यांना पुस्तकी मदत देण्यात अग्रेसर राहिल्या त्यामुळे त्यांच्या महिला म्हणून कार्याला तोड नसल्याने व विधानसभेत क्रियाशील महिला म्हणून त्या नावारूपास आल्या आहेत तशी संधी मिळाल्यास नवा व महिला चेहरा म्हणून त्यांना उमरखेड विधानसभेची जनता स्वीकारू शकते नेहमी बदल करणारा मतदारसंघ म्हणून उमरखेड महाराष्ट्रात नावारूपास आलेला आहे.पक्ष फुटी नंतर त्या अस्वस्थ होत्या मात्र त्यांनी शरद पवार यांचा पक्ष निवडला त्यांचे काम सदोदित व न थांबता आहे जनहितार्थ त्या काम करत असल्याने व राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका अध्यक्षपद समर्थ पणे सांभाळल्याने पक्षाने त्यांना तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस महागांव तालुका म्हणून निवड केली आहे.
आता प्रतीक्षा आहे ती केवळ महाविकास आघाडित ही जागा कोणाला सुटते त्याची मात्र महिला उमेदवार म्हणून संध्या रणवीर यांच्या नावाची चर्चा सध्या तरी मतदारसंघात आहे. त्यांनी ही मतदार संघात भेटी गाठी वाढवल्या आहेत हे दिसून येत आहे.