मोपलवारच्या अवैध संपत्तीचे लोण उमरखेड विधानसभेत ?

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड (दिनांक १४ जुलै) समृद्धी महामार्गाचे जबाबदार अधिकारी मोपलवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत हजारो कोटी रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप विधानसभेत विरोधकांनी उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असतांना त्याच अधिकाऱ्याचे आपण अनुयायी असल्याचे सांगत उमरखेड विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या एका उपविभागीय अधिकारी दर्जाच्या कार्यकर्त्यांकडून मात्र आपण दारिद्र्य रेषेखालील उमेदवार
नसल्याचे जगजाहीर बोलत असल्याने त्याच काळया पैशाचा वापर या ठिकाणी निवडणुकीसाठी केल्या जाणार असल्याचा प्रश्न मतदार संघातील जनतेला पडला आहे.
नागपुर ते मुंबई हा प्रवास कमी वेळात व सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात आला. या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमीनी गेल्या त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला परंतु शासनाने या महामार्गासाठी हजारो कोटी रुपये निधी दिला. याच निधीवर डोळा
ठेवून या महामार्गाचे जबाबदार
साहेबराव म्हणतोय मी या मतदार संघाचा आमदार साहेब, माझे गुरुदेव राधेश्याम
अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी हजारो कोटी रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप पावसाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधी आ. रोहित पवार यांनी उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असताना मात्र याच मोपलवार चे आपण अनुयायी असल्याचे ठासुन सांगत अनुसुचित जातीसाठी राखीव उमरखेड महागाव विधानसभेवर डोळा ठेवून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या एका उपविभागीय अधिकारी दर्जाच्या इसमाने साहेबराव नावाप्रमाणे वागत सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आपल्या खिशात असुन त्यांना आपण पैशाच्या जोरावर खरेदीच केले असल्याच्या आविर्भावात वावरत असुन आपण दारिद्रय रेषेखालील उमेदवार नसुन आपण निवडणूक लढविण्यासाठी कितीही पैसा ओतु शकतो अशी जगजाहीर चर्चा करीत असल्याने मोपलवारच्या अवैध संपत्तीत या इच्छुकांची भागीदारी तर नाही ना..! अशी शंका सर्व सामान्य नागरिकांना येत असुन आगामी निवडणुकीसाठी हा इच्छुक कोणता पैसा खर्च करणार याचा अंदाज त्याच्या बोलण्यावरून सर्व सामान्य नागरिकांना पडला असुन
जेव्हा हे अधिकारी असताना शासनाची फसवणुक करून अवैध माया गोळा करू शकतो तर हा उमेदवार भविष्यात निवडून आलाच तर मतदार संघाचा विकास कसा होणार याचे चित्र आताच जनतेच्या डोळ्यासमोर येत आहे.
हा कार्यकर्ता ज्या काँग्रेस पक्षा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे त्यामुळे काँग्रेस अशा भ्रष्ट कारभाराचा कळस गाठलेल्या व बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिल्यास भविष्यात काँग्रेसचा मात्र याठिकाणी सुफडा साफ होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये जोर धरत आहे.