Uncategorized

राष्ट्रभक्ती सह देश विकासाचा पाया बाबासाहेबांनी रचला – प्रो डॉ अनिल काळबांडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :रूढी प्रथा परंपरेशी सर्घष करीत , शोषीत पीडीत दलीत सह मानसाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत केवळ माझ्या देश्याचे कल्याण व्हावे त्याच्या साठी त्यांनी केलेल्या सर्मपणाच्या त्यागामुळे देश्याचा सर्वांगीण विकास झाला . त्यांच्या राष्ट्रभक्ती मुळे देश विकासाचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी रचल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक प्रो डॉ अनिल काळबांडे यांनी केले .
ते तालुक्यातील दराटी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती च्या संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता आडे ह्या होत्या तर भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा , आमदार किसनराव वानखेडे ,माजी आ. विजय खडसे
,युवासेना प्रमुख श्रीपाल आडे, ,माजी सैनिक आनंदराव जाधव ,उपसरपंच अर्जुन बडेवाड,गोपीनाथ घुले,ज्ञानेश्रर नगारे , स्वागतअध्यक्ष दिपक कांबळे
मुख्याध्यापक कैलास राठोड, अरुण आळणे, प्रविण गायकवाड, युवासेनाप्रमुख दया पाटील, भाजपा उपाध्यक्ष बबन जाधव, चंद्रशेखर शेंडे, डॉ. उदयल जाधव प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते .
डॉ . प्रा . अनिल काळबांडे हे म्हणाले की, या देशांमध्ये कुत्र्याला मुंगीला जीवन जगण्याचा अधिकार होता मात्र माणसाला जिवन जगण्याचा नव्हता . प्राणीमात्रावर निश्चितच प्रेम करावे मात्र माणसे असताना माणसांना त्या काळात प्रेम करण्याचे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले . आम्हाला संपत्ती नको, आम्हाला देशाचे मालकही व्हायचे नाही , फक्त या देशात माणसासारखं जीवन जगू द्या ! यासाठी डॉ . आंबेडकर यांनी आपले आयुष्य खर्ची घालून देशावर अतोनात प्रेम केले , शिक्षण नावाचे शत्र देऊ न बुद्धाच्या ओटीत टाकल्याने आमचा विकास झाल्याचे त्यांनी यांनी सांगितले .
यावेळी नितीन भुतडा म्हणाले की,अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित होत असतात परंतु केवळ जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि एखाद्याचे उद्भबोधन खऱ्या अर्थाने जे आपण ऐकतो किंवा जे परमपूज्य डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते ते आपण अंगीकारणे ही खऱ्या अर्थाने डॉ .बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील यांना श्रद्धांजली असेल आणि त्यामुळे केवळ या ठिकाणी ऐकून चालणार नाही तर उद्धबोधन अंगीकारण हे महत्त्वाचे असल्याचे सांगीतले . या वेळी आमदार किसनराव वानखेडे म्हणाले , सर्व समाजाला एकत्र जोडून संविधानाच्य माध्यमातून बाबासाहेबांनी केलेले कार्य ऐतिहासिक आहे . यावेळी
माजी आमदार विजय खडसे यांनी ‘
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे अवस्था काय होती आणि त्या परिस्थितीमध्ये एवढा मोठा नाही ज्या माणसाला शिक्षणाची दार बंद होती त्या माणसांनी या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिण्याचं काम केलं आणि या देशाला एक विचारधारा दिली असल्याचे सांगीतले .प्रास्ताविकात परशराम भरणे यांनी
दराटी गावात कुठल्याही जाती धर्मांचे उत्सव सर्व समाजाचे लोक एकत्रीत येऊन साजरी करतो सामाजीकतेच
प्रतीक हे गाव आहे या गावचा उपक्रम इतर गावांनी द्यावा असे सांगीतले.
संचलन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार प्रविण मुनेश्वर यांनी मानले . यावेळी दराटी गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!