अवैध गौण खनिज तस्करांचा धुमाकूळ

महसुल मंत्र्यानी तात्काळ दखल घ्यावी
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
महसुल कर्मचाऱ्यांवर गौण खनिज तस्करांचे जिवघेणे हल्ले वाढत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेणे गरजे असताना ही का तस्करावर कार्यवाही होणे करणे असताना तालुक्यात कुठेही कार्यवाही नसून नाकाबंदी सुद्धा नाही. पैनगंगा नदी काठावरील अवैध रेतीचे उत्खन करून चोरठ्या मार्गाने रेती ओढतात त्यावर महसुल प्रशासन उदासीनधोरण न पाळता कठोर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
ऑक्टोंबर महिन्यात रेती घाटांचे लिलाव होत होते. मात्र मागील वर्षीपासून महसुल प्रशासनाकडून रेतीघाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे रेती तस्करांनी स्थानिक
अधिकाऱ्यांना व संबंधित पोलिसांनी हाताशी धरून रेतीचे अवैध उत्खनन करीत शहरात विक्रीसाठी वाहतुक चालविली आहे. काही अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने वाहतूक सुरु आहे. परंतू काही अधिकारी रेती, माती मुरुम तस्करांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी रात्री बेरात्री जातात त्यामुळे सर्व देवाण घेवाण करूनही हिरवा कंदील दाखविल्यानंतरही रेती, माती, मुरूम वाहतुकीची वाहने पकडण्यास आलेल्या महसुल अधिकाऱ्यांविरुद्ध रेती तस्कर आपला राग व्यक्त करीत जिवघेणे हल्ले करतात अशी चर्चा तस्कर वर्तुळात सुरु आहे.प्रशासनाकडून रेतीघाट लिलाव
होत नसल्यामुळे विटभट्टी व्यवसायिक वैतागून गेले आहेत. त्यामुळे महसुल अधिकारी व पोलिसांशी हातमिळवणी करून मागील वर्षीपासून तालुक्यातुन वाहनाऱ्या पैनगंगा नदीपात्राचा तसेच ओढ्या, नाल्यांचा रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. महसुल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस यांनी कुठेही कार्यवाही केली नाही तर अश्या अवैध मार्गाने तस्करी करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला पाहीजे. हे हल्ले रोखण्यासाठी रेतीघाटांचे वेळत लिलाव करावे व विटभट्टयांना वेळेत परवानगी दिल्यास या प्रकारांना पायबंद होईल अशा प्रतिक्रिया उमटत
आहेत. (श.प्र.)