Uncategorized

शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत खरीप हंगामात जाहीर केलेली मदत अद्यापही मिळालीच नाही

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वर करणी दाखवीत असले तरीही प्रत्यक्षात मात्र शासनाच्या करणी आणि कथनी मध्ये फरक असल्याची ओरड आता थेट शेतकऱ्यातूनच होत असल्याचे दिसत आहे मागील खरीप हंगामात तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे खरिपातील हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली होती यात सोयाबीन कपाशी सारखी नगदी पिके शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत टाकून गेली यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला लावलेल्या लागवड खर्चालाही मुकावे लागले होते अशातच राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले होते व पंचनाम्यानंतर मदत देखील जाहीर करण्यात आली होती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार म्हणून शेतकऱ्यांकडून बँकेचे खाते क्रमांक व आधार कार्ड देखील महसूल व कृषी विभागाकडून जमा करण्यात आले होते या सर्व गोष्टीला तीन महिन्याच्या वर कालावधी उलटून गेला असला तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कुठलीही आर्थिक मदत राज्य शासनाकडून देण्यात आली नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळत असून याबाबतीत जिल्ह्याच्या पालकमंत्री सह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आर्थिक मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!