हिंगोली लोकसभा मतदार संघात भेटी गाठी

उत्कृष्ट पक्षकार्य करणारे रामदास पाटील सुमठाणकर
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
मराठवाडा व विदर्भ असा दुहेरी प्रवास असलेला हिंगोली
लोकसभा मतदारसंघ अगदी किनवट मांडवी हे नांदेड जिल्ह्यातील
अतिदुर्ग तसेच पैनगंगा अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेला बिटरगाव
(बू) हा यवतमाळ जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. शिवाय हा परिसर
विस्ताराने एवढा मोठा असलेला लोकसभा मतदारसंघ असताना त्यातील अनेक ठिकाणी भेटी देऊन पक्षाचे ध्येय धोरण व येणाऱ्या काळात पक्ष कोणती कामे करणार आहे याची माहिती रामदास पाटील सुमठाणकर हे सातत्याने मतदारसंघात देताना दिसत आहेत. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट संसदपटू व एकेकाळी एकमेव खासदार म्हणून असलेले कै. राजीव सातव हे या भागाचे प्रश्न सातत्याने मांडून या मतदारसंघाच्या अडचणी सोडवत असत आणि संसदेत सुद्धा प्रकषनि मांडत व त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुद्धा मिळाला त्यामुळे नक्कीच हिंगोली मतदारसंघाचे नाव उंचावल्या गेले. येणाऱ्या काळामध्ये उत्कृष्ट संसद पटू म्हणून रामदास पाटील सुमठानकर सुद्धा असू शकतात मध्यंतरी संसदेमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अडचणी मांडताना व
सोडविताना फार कमी वेळा बघायला मिळाल येणाऱ्या काळात
रामदास पाटील सुमठानकर यांच्या रूपाने एक सुज्ञ सुजाण सुविचारी कर्तबगार स्वरूपाचे राजकीय तरुण नेतृत्व लाभल्यास या भागाचा नक्कीच विकास होईल अशी अशा सर्वसामान्य जनता बाळगून आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामदास पाटील हे नेतृत्व पक्के असल्याचे बोलल्या जात आहे. हर घर जल जीवन मिशन, जलजीवन मिशन ग्रामीण उद्दिष्टे त्यामध्ये जलजीवन मिशनचे मुख्य उद्दिष्टे देशातील सर्व घरांना दीर्घ कालावधीसाठी पाण्याची उपलब्ध करून देणे अशा महत्त्वपूर्ण बाबीची माहिती त्या फिरत्या रथावर असल्यामुळे ती गाडी एक सर्वसामान्यांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांचे एक माहिती भंडारा होते विशेष म्हणजे कोरोना काळात केलेल्या विविध सेवा उपक्रमाच्या बद्दल सांगावयाचे झाल्यास ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रक्षाबंधन स्वरूपात कृतज्ञता व्यक्त करणे. कोरोना काळात हिंगोली शहरात शिधावाटप व विविध समाजाला पोषक उपक्रम राबविली आहे. हिंगोली शहरात प्रशासक म्हणून असताना शहरात हरित पट्टे वृक्ष लावगड विविध समाजाच्या स्मशानभूमीचा विकास मोठ्या प्रमाणात केला. शहरात सर्व स्वच्छता मोहिमेअंतर्गत नियमितपणे स्वच्छतेची अंमलबजावणी केली महात्मा गांधी पुतळ्याचे सुशोभीकरण तसेच आर्थिक सुबत्ता
आणून काही ठिकाणी निधी कसा वापरावा हे अनेक ठिकाणी माहीत
नसते पण रामदास पाटलांनी हिंगोली शहराला ६९ कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करून अंमलबजावणी केली यावेळी यावरून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडून त्यांनी जनमानसात एक अच्युत बलस्थान निर्माण केले. अनेक राजकारण्यांना वडिलोपार्जित कोणता ना कोणता स्वरूपात वलय प्राप्त होतो. पण रामदास पाटील यांना असा कोणताही राजकीय पारंपारिक वारसा नसताना आपले कर्मच बलस्थान म्हणून काम बघत आहे. विशेषता त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. स्वतः हा २००९ एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्याधिकारी म्हणून अकोला, किनवट, माहूर, देगलूर, हिंगोली येथे बारा वर्षे प्रशासकीय बाजू हाताळली. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा शिकून उच्च पदावर जाऊन त्या मुलांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवाव्या या अनुषंगाने मध्यमवर्गी व गरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणी केली. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रामदास पाटील सुमठानकर हेच उमेदवार असतील असे सर्वसामान्यांना वाटत आहे.